शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

शिक्षक भरतीस बंदी... जाहिराती मात्र झळकू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:13 AM

एकीकडे गुणवत्तेवर आधारित, शंभर टक्के मागास, अनुशेष पूर्ततेला प्राधान्य देत, गुणात्मक दर्जावर पवित्र पोर्टलद्वाराच सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित एवढेच ...

एकीकडे गुणवत्तेवर आधारित, शंभर टक्के मागास, अनुशेष पूर्ततेला प्राधान्य देत, गुणात्मक दर्जावर पवित्र पोर्टलद्वाराच सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित एवढेच नव्हे तर विनाअनुदानित शाळांमधीलही रिक्त शिक्षक पदे भरती शासन करणार असल्याचे वारंवार जाहीर करण्यात आले. मात्र पाच वर्षांत कुठलीच कार्यवाही पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांअभावी मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान तर झालेच; पण पवित्र पोर्टल भरतीच्या आशेवर बेरोजगारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. खासगी शैक्षणिक संस्थांचे भरती अधिकारही गोठवण्यात आल्याने संस्थांची शासनाबाबत नाराजी आणि बेरोजगारांचाही प्रचंड रोष उफाळून आला आहे.

अशातच कोंडी फोडण्याचे काम काही शैक्षणिक संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध करून, बेरोजगारांना नोकरीसाठी पुचकारण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे. वाढते वय पाहता काही बेरोजगारांनी आर्थिक निकषावर अशा अनधिकृत जाहिरातीनुसार सेवा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. नियमाला पोटनियमाचा आधार घेऊन, भरतीबंदीच्या शासन निर्णयापूर्वी बॅकडेट अपाॅइंटमेंटचा तोडगा शोधल्याची सवंग चर्चा आहे. यामागे शिक्षण खात्यातील काही गाॅडफादर सल्लागार असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, पवित्र पोर्टल भरतीत जे उमेदवार पात्र ठरून नेमणुकीच्या प्रतीक्षेत आहेत, अशांपैकी काहींनी भरती जाहिरातीच्या कात्रणासह राज्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षणमंत्री यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या असल्याचे समजते.