शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:18 AM

(डमी ८८२) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता. ...

(डमी ८८२)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत नाही. कारण जुलै महिना उजाळला असतानादेखील पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यात जिल्ह्यात ३० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी निम्मे क्षेत्रावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

चोपडा, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये जून महिन्याचा सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. तर इतर ठिकाणीदेखील अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्यस्थितीत केवळ ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही २० टक्के क्षेत्र हे बागायती कापसाचे आहे. तर उर्वरित १० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू जमिनीवरचे आहे. ज्या भागात सोयाबीनची पेरणी लवकर झाली होती. अशा भागात सोयाबीनचे पीक पुर्णपणे जळून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी इतरांकडून पाणी घेवून पीके जगवण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी करावी लागणार आहे. उडीद व मूग अजूनही तग धरून असले तरी येत्या तीन-चार दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास उडीद-मूग लागवड केलेल्या शेतकऱ्यांवरदेखील दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

तर दुबार पेरणी अटळ

जिल्ह्यात २५ जूननंतर समाधारक म्हणता येईल असाही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्याचा सरासरीपेक्षाही १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. लवकर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. सध्यस्थितीत मान्सूनला ब्रेक लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, १० जुलैनंतर पाऊस सक्रिय न झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगाम लांबून, दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होणार आहे.

बाजरीचा पेरा वाढणार

जिल्ह्यात दरवर्षी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होत असते, मात्र यावर्षी सोयाबीन, मूग व उडीद या पिकांना कमी झालेल्या पावसामुळे फटका बसणार असल्याने जिल्ह्यात यंदा बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून यंदा २०० क्विंटल बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. कमी कालावधीत येणारे पीक असून, चाऱ्यासाठी देखील याचा वापर होतो. दरम्यान, सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट होण्याची शक्यता आहे.

चोपडा,अमळनेर तालुक्यात कमी पाऊस

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीच्या १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. रावेर, यावलसह पाचोरा, तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी चोपडा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात यावर्षी जून महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यात ३० जूनपर्यंत केवळ १२ ते १५ टक्केच पाऊस झाला आहे. तसेच पाऊस लांबला तर पेरण्या देखील लांबतील, त्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोट...

जिल्ह्यात काही ठराविक तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये बरा पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस लांबल्यास झालेल्या पेरण्याही वाया जाण्याची भिती आहे. कृषी विभागाकडून दुबार पेरणीसाठी देखील बियाणे उपलब्ध आहे. मात्र, ती वेळ शेतकऱ्यांवर येवू नये अशी आशा आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक,

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

गेल्या वर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. जुलैपर्यंत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येईल अशी आशा होती. मात्र, नंतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपुर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. तर यावर्षी देखील सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आता सर्व निसर्गावर अवलंबून आहे.

-कैलास जाधव, शेतकरी, फुपनगरी

बियाण्यांचे दर वाढलेले असताना, बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक पुन्हा वाया गेले आहे. आता पुन्हा बियाणे घ्यावे लागणार आहे. आता जे पण उत्पन्न येईल त्यात झालेले नुकसान भरून निघाले तरी चालेल. मात्र, पुन्हा निसर्गाने पाठ फिरविली तर मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळणार आहे.

-रमेश पाटील, शेतकरी, निरुळ.