शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

साकेगाव हाणामारीप्रकरणी गावात शांततेची दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक १५ रोजी बोलावली होती. या दोन्ही गटाकडून गावात शांततेची ग्वाही देण्यात आली.

साकेगावात तब्बल ३३ जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात, मात्र एखादी दुर्दैवी घटना घडल्यास गावात तणाव निर्माण होतो. क्षणिक संतापाच्या भरात भविष्याचे नुकसान होऊन जाते हे जर घटनेच्या वेळीच लक्षात ठेवले तर असा प्रसंग कधीच उद्भवणार नाही. जे लोक हाणामाऱ्यांसाठी इतरांना प्रवृत्त करतात, पण ते कधीच कृतीमध्ये सामील होत नाही, लांबूनच भांडणांचा आनंद घेत असतात अशांच्या नादी लागू नका. अप्रिय घटनेनंतर कोर्टकचेऱ्या, पोलीस ठाण्याच्या चकरा याशिवाय दवाखान्यात लागणारा खर्च, मानसिक तणाव तसेच समाजात बदनामी होते याचे सर्वांनी भान ठेवावे. एखादेवेळेस वादाचा विषय निघाला तर तो सामोपचाराने मिटवून घ्यावा, असे शांतता कमिटीच्या बैठकीत तालुका पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांना उद्देशून सांगितले.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, पोलिसांची राहणार करडी नजर

अनेक भांडण-तंटे गैरसमज हे सोशल मीडियाद्वारे पसरत असतात. कोणीही चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकू नका, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका. आपल्या एका चुकीमुळे गावात वाद निर्माण होऊ शकतो. यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी करा. एखाद्याने वाद वाढविण्याच्या इराद्याने काही पोस्ट टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, अशी तंबीही या वेळी कुंभार यांनी दिली.

याप्रसंगी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते.