शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

प्रवास सुरू होण्याआधीच बसला बिघाड झाला होता, अपघाताचे वृत्त कळताच उडाला थरकाप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 9:17 AM

पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले.  

- सुधीर चौधरीयावल (जि. जळगाव) : प्रवास सुरू होण्यापूर्वी अपघातग्रस्त बसमध्ये काही बिघाड झाला होता. त्यावेळी स्थानिक मॅकेनिकला बोलावून दुरुस्ती करण्यात आली. यानंतर दोन्ही बसमधून भाविकांचा प्रवास सुरू झाला. 

पाच ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर पहिल्या वाहनातील भाविक चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले.  त्यावेळी मागच्या बसला भीषण असा अपघात होऊन बस नदीमध्ये पडल्याचे समजताच आमच्या सर्वांचा थरकाप उडाला. राणे यांच्यासोबत संजय ढाके, प्रमोद सरोदे , मनोज चौधरी (रा. वरणगाव) यांनीही या अपघाताबद्दल माहिती दिली. पहिल्या बसमध्ये ४४ प्रवासी तर लहान बसमध्ये १० प्रवासी होते.

नेपाळला जाण्याचा मोह टाळला आणि ते वाचलेजळगाव : वरणगाववर १८ वर्षांनंंतर पुन्हा एवढी मोठी आपत्ती कोसळली आहे. ३० ऑक्टोबर २००६ रोजी वरणगावचे काही भाविक शिर्डी, शनी शिंगणापूर अशा तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. ह्या भाविकांच्या वाहनाला गावाकडे परतताना भीषण अपघात झाला होता. त्यात ८ जण ठार झाले होते. २००६ मधील त्या घटनेत आपली सहचारिणी गमावलेले दत्तात्रय झांबरे हे सुदैवी ठरले. तेही अयोध्या गेलेले होते. तेथे नेपाळला जाणारी ही पर्यटक मंडळी त्यांना भेटली होती आणि त्यांच्यासोबत पाच जागा रिकाम्या असल्याने नेपाळला येण्याचा आग्रह त्यांना काही जणांना केला होता पण झांबरेसह अयोध्येला गेलेल्या भाविकांनी ते टाळल्याने सुदैवी ठरले.

टॅग्स :Jalgaonजळगाव