शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

विकासासाठी हेवादावा व्हावा, पाण्यासाठी दुष्काळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:15 IST

बोदवड तालुका वार्तापत्र

गोपाल व्यास, बोदवड 

बोदवड तालुका पूर्वीपासूनच अवर्षणग्रस्त आहे. यासाठी जितके केले तितके कमी म्हणावे लागेल, अशी स्थती तालुक्याची आहे, गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोदवड शहरा सह तालुक्यात पाणी प्रश्न फार गाजला होता. पण चार वर्षे उलटूनही शहराची पाणी समस्या कायम आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पाण्याने चित्र ही पालटवले नाही. तालुक्यात आज ही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. आता तालुक्यात २९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार असून यात मोठ्या ग्रामपंचायत शेलवड, जामठी,एणगावचा समावेश आहे तर पाणी समस्या अजूनही सुटली नसल्याने ह्या निवडणूक ही पाण्यावर गाजतील अशी स्थती आहे, हेवेदाव्यांचे राजकारण जोरात तालुक्यात आमदारांनी शिरसाळा मारोती मंदिर लॉकडाऊनमध्ये उघडले, तर खासदारांनी कापूस खरेदी मुहूर्ताला आमदारांना टाळले. यात दोन्ही गटातून शाब्दिक हेवादावा आला तर एकनाथ खडसे यांनी आता हातावर घड्याळ बांधल्याने नगरपंचायतमध्ये विरोधात असलेल्या राष्ट्रवादी चे काटे जोरात फिरले व नगरपंचायतमधील विरोध मावळला आहे. आपापसात शहरातील गटारी,रस्ते वाटून घेतले व तब्बल सात कोटींच्या रस्ते गटारींच्या कामाना सुरवात झाली आहे. मात्र महिना उलटत नाही तोच या रस्त्यांवर खड्डे पडायला तर गटारी पडायला सुरवात झाली आहे, पण आता विरोध करणार कोण असा प्रश्न पडला आहे,तर राजकारणातील हेवेदावे किमान आता तालुक्याचा विकासासाठी व्हावे हीच अपेक्षा आहे, कापूस उद्योगाला लॉकडाऊनची भीती शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी नसताना चिल्ड वाटर प्लॉंट, साबण उद्योग, व शहरातील बोगस गटारी यावर नगरपंचायतीची कृपा आहे तर अवैध धंदे, चोरीवर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहेत. अवैध वाळू वाहतुकीने तर शहरातील रस्त्यांची जणू वाट लागली आहे. औरंगाबाद -इंदूर हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात आहे. त्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार व राष्ट्रवादीमध्ये आलेल्या नेत्याकडून विकासाची आस नागरिकांना आहे तर दोन्ही गट मुक्ताईचा आशीर्वाद लाभावा हीच अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBodwadबोदवड