शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

रेल्वेद्वारे १० हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:08 PM

कोरोनातील उत्पन्न : बसने पावणेतीनशे टन मालाची वाहतूक

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत जळगावरेल्वे स्थानकावरून १० हजार टन जीवनावश्यक वस्तू बाहेरगावी रवाना करण्यात आल्या आहेत.तसेच गेल्या पंधरा दिवसापासून एस. टी. महामंडळानेही सुरू केलेल्या मालवाहतुकीद्वारे आतापर्यंत ३०० टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने तेव्हापासून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी सेवा बंद ठेवून फक्त जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यात येत आहे. नागरिकांना आपले नातलग व मित्र परिवाराला कुठलीही जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी प्रत्येक राज्यात मालगाड्या व पार्सल यान सोडण्यात येत आहे.रेल्वे प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून ही सेवा देण्यात येत असून, यासाठी नागरिकांकडून अत्यल्प भाडे आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे पाठवलेली वस्तू अवघ्या काही तासातच संबधित व्यक्तीकडे रवाना होत आहे. त्यामुळे जळगाव येथून मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इतकेच नव्हे तर दिल्लीपर्यंत वस्तू पाठविण्यात आल्या असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. नागरिकांनीही या सेवेचा फायदा उचलला.दोन महिन्यांत १० हजार टन माल रवानाभुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल यान व मालगाड्यांद्वारे जळगावहून आतापर्यंत विविध प्रकारच्या वस्तूंचा सुमारे १० हजार टन माल विविध राज्यात रवाना करण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये धान्य, औषधांचा साठा, घरातील इतर जीवनावश्यक वस्तू यासह खते, बियाणे व गेल्या आठवड्यात दिल्ली येथे केळीदेखील पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरूनदेखील काही नागरिकांच्या वस्तू रेल्वेने जळगावला आल्या. दरम्यान, या १० हजार टन मालामध्ये सर्वाधिक वाहतूक ही खते व बियाण्यांची झाल्याचेही सांगण्यात आले.एस. टी.द्वारे दहा दिवसांत तीनशे टन मालवाहतूककोरोनामुळे एस. टी. महामंडळाच्या सेवेला फटका बसला असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीदेखील महामंडळाकडे पैसे नव्हते. या तोट्यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळातर्फे गेल्या आठवड्यापासून मालाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बसचे ट्रक मध्ये रूपांतर करून व्यापारी व उद्योजकांचा माल राज्यभरात विविध ठिकाणी पोहचविण्यात येत आहे. सेवा सुरू झाल्यापासून दहा दिवसांत महामंडळाच्या ट्रकद्वारे २६८ टन मालाची वाहतूक करण्यात आली असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.आगार निहाय मालाचे उत्पन्नआगार उत्पन्न१) जळगाव ९८,७९९ रूपये२) जामनेर १३,०३९३) रावेर १,१६,९९७४) चोपडा ३०,०३९५) एरंडोल २०,७३६६) यावल ६,३००७) अमळनेर ६,४७५८) भुसावळ ११,११०९) मुक्ताईनगर १५,१४५१०) पाचोरा १०,०००एकूण उत्पन्न ३,२८,६४०३० जूनपर्यंत सेवा... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने तोपर्यंत मालवाहतूक सेवा सुरू राहणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जळगाव स्थानक येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव