शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:39 IST

वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनार-पार योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूदडास मुक्त चाळीसगाव शहराचा संकल्प७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

चाळीसगाव, जि.जळगाव : वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.शनिवारी सायंकाळी सात वाजता गिरीश महाजन यांच्या हस्ते चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चाळीसगावच्या उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, मंगेश चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, रमेश चव्हाण, श्यामलाल कुमावत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.गिरणा नदीतील पाणी मन्याड धरणात टाकण्याची मागणी असो की, नदीजोड प्रकल्प, दुष्काळामुळे पाण्याची तीव्रता अधोरेखित झाली आहे. गिरणेवरील बलून बंधाºयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. पाणी जपून वापरा, असे संदेश देतानाच गिरीश महाजन यांनी स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही नमूद केले.उन्मेष पाटील यांचे मनोगतचाळीसगाव शहराचा डीपीआर मंजूर करून ७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे. पुढच्या काळात डासमुक्त चाळीसगाव शहरासाठी भूयारी गटार कार्र्यान्वित करण्याचा प्रस्ताव केला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये चाळीसगावची गणना व्हावी, असे नियोजन पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगून आमदार उन्मेष पाटील गत पंधरा महिन्यात पालिकेने राबविलेल्या उपक्रमांचा आढावाही मांडला. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याचे अश्वासन पूर्ण केले असून नविन ३४६ कोटी रुपयांच्या कामांचेही आज भूमिपूजन झाल्याचे त्यांनी सांगितले.आशालता चव्हाण, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छाग्रह प्रकल्प व घंटागाड्या, जेसीपी यांचे लोकार्पण, शताब्दीच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्र्थींना आदेशाचे वितरणही केले गेले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी, तर सूत्रसंचालन मनोहर आंधळे व अर्जुन परदेशी यांनी केले. आभार दिगंबर वाघ यांनी मानले. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव