शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 10:49 IST

आषाढी वारी दिंडीत प्रतिनिधी म्हणून वारकऱ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे.

ठळक मुद्देवारकऱ्यांच्या भावना आणि परंपरा यांचा आदर करावावारकरी मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची मागणी

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकऱ्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर) यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत श्री पांडुरंगाची आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी भरत असते. अनेक पिढ्यानपिढ्या पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो वारकरी पायी चालत भक्तीसुखाचा आनंद घेत पंढरपूर येथे येऊन ही उपासना व साधना परंपरा जोपासली आहे. यावर्षी कोरोना रोगाचा प्रसार व महामारीचे आलेले संकट लक्षात घेता व जनहितार्थ गर्दी होऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे वारी भरणे अश्यक्य वाटत आहे. परंतु वारी परंपरा जोपासणे व आपली साधना खंडित न होता अखंडित राहणे हेसुद्धा संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याकरिता शासनाने मध्यम मार्ग काढून द्यावा. केवळ पायी दिंडीचे परंपरेचे प्रत्येकी १० प्रतिनिधी यांना आषाढ शु. चतुर्थी ते पौर्णिमा या दहा दिवसांच्या वारीच्या कालावधीत वेळ दिवस निश्चित करून द्यावा. त्यावेळेत वारकरी पंढरपूर येथे आपापल्या वाहनाने जाऊन सर्वांच्या वतीने वारी करून येतील. याबाबत जिल्हावार नियोजन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रीतसर सर्व अटी शर्तीची पूर्तता करून परवानगी द्यावी. वारकरी प्रशासनाचे सर्व नियम पाळतील. दहा दिवस व प्रत्येक दिवसात सोळा तास या नियोजनानुसार पंढरपूर येथे कोणतीही गर्दी होणार नाही. शासनाने वारकरी समुदायाच्या भावनांचा व परंपरांचा आदर राखून तत्काळ नियोजन जाहीर करावे व रीतसर परवानगी मिळावी, अशी विनंती दिगंबर महाराज वारकरी पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर