शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

जिल्ह्यात ४६ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:50 AM

दुष्काळाची झळ

ठळक मुद्दे  ७३ विहिरी केल्या अधिग्रहीत

जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडते आहे. मात्र अशा परिस्थितीतही टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला अस्वस्थ करून असून आतापासून ४६ गावांना टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. यासह टंचाई निवारणासाठी विविध योजनांची अंमलबजावणीदेखील केली जात आहे.गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रारंभीच्या कालखंडात चांगला पाऊस झाला. मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला. विविध तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्येही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. केवळ एरंडोल तालुक्यातील काही गावांमध्ये ही परिस्थिती नसल्याचे लक्षात येते.पाण्यासाठी वणवणपाऊस नसल्यामुळे नद्या वाहून निघतील असे पाणी आले नव्हते. याचे परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाले आहेत. जिल्ह्यातील केवळ हतनूर धरणात बऱ्यापैकी पाणी साठा झाला. गिरणा प्रकल्प जेमतेम २५ टक्के तर वाघूरमध्ये सद्य स्थितीत ३४ ते ३५ टक्के पाणी साठा आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेऊन सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणी हे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. याचा फटका रब्बी पेºयाला बसला आहे. पाऊस नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वणवण आतापासूनच सुरू असल्याचे दिसून येत आहे.अनेक गावांना टॅँकरने पाणीगावांच्या पाणी योजना आटल्याने आता तेथे टॅँकरने पाणी पुरवठा केला जावा,अशी मागणी वाढत आहे. परिणामी सद्य स्थितीत ४६ गावांना २८ टॅँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. गावांमध्ये रात्रंदिवस पाणी पुरवठा करावा लागत आहे. अनेक गावात रात्री उशिराने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिला व लहान मुले टॅँकरची वाट पहात असतात. यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ३० गावांना टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात ८, पारोळा तालुक्यात ४ व जळगाव तालुक्यातील एका गावाला टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.अनेक योजनांची अंमलबजावणीटंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात सार्वजनिक स्त्रोत आटल्याने खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७१ गावांमधील ७३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यासह सहा गावांमध्ये तात्पुरती पाणी योजना, तीन गावांमध्ये विहिरी खोल करून पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाची झळ वाढल्यानंतर टंचाईत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई