शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

आता जे होईल ते मैदानातच - रमेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:16 IST

सर्व ७५ उमेदवारांची यादी तयार

ठळक मुद्देशिवसेनेच्या चिन्हावर लढणारजनतेचा दादांवरचा विश्वास कायम

जळगाव : युती होईल की नाही हे आता सांगता येणार नाही, आमच्या सर्व ७५ उमेदवारांची यादी आम्ही तयार केली आहे. तसेच बुधवारपर्यंत सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आता जे होईल ते मैदानात होणार असल्याची माहिती माजी महापौर रमेशदादा जैन यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.शिवसेनेच्या चिन्हावर लढणाररमेशदादा म्हणाले की, सर्व ७५ जागांवर शिवसेनेकडून उमेदवार दिले जाणार असून चांगले उमेदवार देण्यावर भर दिला जाणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय सुरेशदादांनी घेतला होता. त्या निर्णयाचा मान ठेवून आम्ही सर्व मावळ्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली आहे.जनतेचा दादांवरचा विश्वास कायमसुरेशदादा जैन यांनी निर्मळ मनाने व जळगावच्या विकासाच्या दृष्टीने युतीबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ज्या पध्दतीने आतापर्यंतच्या घडामोडी झाल्या आहेत त्या सर्व घडामोंडीबाबत जनतेत नाराजी आहे. सध्या जे घडक आहे ते आमच्या नियमात नसून, जळगावकरांनी आतापर्यंत सुरेशदादांवर जो विश्वास दाखविला आहे. तोच विश्वास पुढे देखील कायम राहणार असल्याचा विश्वास रमेशदादा जैन यांनी व्यक्त केला.शिवसेनेकडून मंगळवारी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, बुधवारी उर्वरीत सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. यासाठी पक्षाकडून सर्व उमेदवारांना सकाळीच एबी फॉर्म दिले जाणार आहेत. याबाबत रात्री उशीरापर्यंत सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. यामद्ये उमेदवार निश्चितीबाबत चर्चा झाली.कोल्हेंच्या पक्षांतरामुळे काही फरक नाहीमहापौर ललित कोल्हे यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत पत्रकारांनी रमेशदादा जैन यांना विचारले असता. त्यांनी सांगितले की, ललित कोल्हे यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम झाला नाही. उमेदवारांच्या यादीमधून त्यांच्या नावावर काट मारून, त्या जागी दुसºया उमेदवाराचे नाव टाकणे इतकाच माझा वेळ गेल्याचे सांगत कोल्हेंना टोला लगावला.आपण कुठे जात आहोत याचाच विचार विरोधकांनी करावाउमेदवार पळवा-पळवी बाबत बोलताना रमेशदादा म्हणाले की, सर्व घडोमोंडीवर सर्व जळगावकर लक्ष ठेवून आहेत. ज्या पध्दतीने उमेदवारांची पळवा-पळवी सुरु आहे. यावरुन आपण कुठे जात आहोत याचा विचार विरोधकांनी करावा असेही रमेशदादा म्हणाले. युती होईल की नाही ? याबाबतचा निर्णय सुरेशदादाच घेणार आहेत. मात्र, मी माझ्या पक्षाच्या ७५ उमेदवारांची सुरेशदादांकडे सोपविणार असून, अखेरचा निर्णय सुरेशदादाच घेणार असल्याचेही रमेशदादा म्हणाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव