शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

कुजबूज ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:21 AM

ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे! शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू ...

ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे!

शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील नवीन रस्त्यांच्या कामाला ब्रेक लागला आहे. या योजनांच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागो-जागी खड्डे झाली आहेत. एवढेच नव्हे तर मोठ्या वाहनामुळे धूळ उडत असून, नागरिकांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते तरी बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहे.

सुरुवातीला अमृत योजनेच्या कामासाठी शहरातील गल्ली-बोळांमध्ये खड्डे खोदण्यात आले होते. पाइपलाइन टाकल्यानंतर या खड्ड्यांची थातूर-मातूर दुरुस्ती संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. परिणामी, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये वाहने अडकली. एवढेच नव्हे तर धुळीचे प्रमाणसुद्धा वाढले. काहींना तर रस्त्यांवरून खड्डा चुकवित असताना आपला जीव गमवावा लागला तर काहींना पाठीचे आजारसुद्धा जडले. पावसाळ्यात तर संपूर्ण रस्ते चिखलमय पहायला मिळाले. त्यामुळे शहरापेक्षा खेड्या-पाड्यातील रस्ते तरी बरे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. आता काही भागांमध्ये दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी हे काम थातूर-मातूर पद्धतीनेच होत आहे. त्यामुळे खड्डे खोदल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

सागर दुबे