शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी...

By अमित महाबळ | Published: October 08, 2023 6:39 PM

सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. 

जळगाव : विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून न राहता विद्यापीठांनी कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत. सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रविवारी, सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ.के.बी.पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

रस्तोगी म्हणाले की, आपल्या देशात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी आहे. ही संख्या वाढवावी लागणार आहे. विद्यापीठ आणि प्राधिकरणांचा बहुतांश वेळ हा परीक्षा, संलग्नता आदींमध्ये जातो. विद्यापीठांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांची वाट बघावी लागते. सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

त्या महाविद्यालयांना विद्यीपाठाचा दर्जा विचाराधीनउच्च शिक्षणातील गुणवत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्राचे काम खूप उत्तम आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे स्वत: गुणवत्ता व उत्कृष्टतेचा आग्रह धरणारे आहेत, असे सांगून रस्तोगी यांनी भविष्यात स्वायत्त महाविद्यालयांना पदवी प्रदान करणाऱ्या विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले.

यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या माहितीपत्रकाचे विमोचन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (ऑनलाईन) केंद्र आणि भौतिकशास्त्र प्रशाळेत प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रयोगशाळेची माहिती संचालक प्रा. ए. एम. महाजन यांनी दिली. प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परिषद, सिनेट सदस्य, विद्यापरिषद सदस्य उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव