शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

बालाजी पेठेतील दोन मजली व्यापारी संकुल जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेले दुमजली व्यापारी संकुल मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून जमिनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी व या संकुलातील काही गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी व उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी हुज्जत घालून कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तणाव वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करून, विरोध करणाऱ्यांना अटक करण्याचा इशारा दिल्यानंतर वाद शांत झाला व मनपाकडून कारवाई पुर्ण करण्यात आली.

बालाजी पेठेतील मुख्य चौकात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाने दिल्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता मनपाचे पथक याठिकाणी दाखल झाले. मात्र, संबधित गाळेधारकांनी दुकानातून माल व इतर साहित्य बाहेर न काढल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य बाहेर काढण्यास सूचना दिली. मात्र, गाळेधारकांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ कारवाई थांबविण्यात देखील आली. मात्र, पोलिसांनी येवून स्थितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर गाळेधारकांनीही मार्केटमधील साहित्य बाहेर काढत, सर्व गाळे खाली केले. त्यानंतर मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या जेसीबीकडून सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

काय आहे प्रकार

१. शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात मनपाच्या मालकीच्या जागेवर गेल्या तीन वर्षांपासून दुमजली इमारत बांधून त्याठिकाणी सहा दुकाने व तळमजल्याचे व्यापारी संकुल तयार करण्यात आले होते. याबाबत विनोद शर्मा नामक व्यक्तीने मनपा नगररचना विभागाकडे तक्रार करून, हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले होते. त्यावर नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले.

२. तसेच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाला आदेश देवून हे बांधकाम पाडण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. १९ डिसेंबर २०१९ रोजी हे आदेश काढण्यात आले होते. मात्र, तब्बल दोन वर्ष यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तब्बल दोन वर्षांनंतर मनपाकडून मंगळवारी हे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले.

मनपा प्रशासनाचा दावा

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ही जागा मनपा मालकीची असून, यावर भाजीपाला मंडईचे आरक्षण आहे. मात्र, दिलीप लखमल सिखवाल यांनी मनपाची कोणतीही परवानगी न घेता या जागेवर बांधकाम करून घेतले. तसेच याबाबत अनेकवेळा नोटीस देवून देखील हे बांधकाम काढले नाही. तसेच या प्रकरणी न्यायालयाचे देखील मनपाकडे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली. तसेच विकास आराखडा योजनानुसार या परिसरातील इतर जागा देखील मनपाच्या नावावर असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संकुल बांधकाम करणाऱ्यांचा दावा

या संकुलाचे बांधकाम करणाऱ्या दिलीप सिखवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जागा आमच्या मालकीची असल्याचे सिखवाल यांनी सांगितले. तसेच १९६४ साली तत्कालीन नगरपालिकेने याठिकाणी भाजीपाला मंडईसाठी आरक्षण टाकले होते. मात्र, ते आरक्षण रद्द झाले असून, मनपाने मोबदला देखील दिलेला नाही. तसेच हे बांधकाम तोडण्यासाठी मनपाने कोणतीही नोटीस आम्हाला बजाविली नाही, केवळ तोंडी आदेश मनपाने दिले असल्याची माहिती दिलीप सिखवाल यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.