शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

लग्न लागणार इतक्यात नवरी प्रियकरासोबत फरार, नवरदेवाने जे केलं त्यावर बसणार नाही विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:35 PM

Marriage News : नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

Marriage News : यूपीमधून सतत लग्नासंबंधी अजब घटना समोर येत असतात. पुन्हा एकदा  उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून लग्नासंबंधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरी लग्नाच्या मंडपातून प्रियकरासोबत पळून गेली. नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने असं काही केलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 

नवरदेव वरात घेऊन आला. लग्नाचे रितीरिवाज सुरू झाले. हार घालण्याची वेळ आली तेव्हा नवरी पळून गेली. दुसरीकडे नवरी पळून गेल्याची सूचना मिळताच नवरदेवाने काचेचे तुकडे बारीक करून खाल्ले. ज्यामुळे त्याची स्थिती गंभीर झाली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला लखनौ ट्रामा सेंटरला रेफेर करण्यात आलंय.

सेमौरी गावातील ही घटना आहे. इथे राहणारा अजय कुमार याचं लग्न आशा नंदपूर येथील शिवानीसोबत ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी 28 जूनला नवरदेव अजय वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. नवरीकडील लोकांनी त्यांचं स्वागत केलं. नवरदेव घोडीवर बसून वरात काढण्यासाठी तयार झाला होता. पण हार घालण्याचा रिवाज होण्याआधीच नवरदेवाकडील लोकांना सूचना मिळाली की, नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. 

मुलीकडील लोकांना याची सूचना पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना शांत केलं आणि वरात घरी परत पाठवली. पण नवरीशिवाय वरात परत न्यावी लागल्याने नवरदेवाला धक्का बसला होता. कशीतरी रात्र गेली आणि सकाळी नवरदेवाने काचेचे तुकडे बारीक करून गिळले. ज्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याच्यावर आता लखनौच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती गंभीर आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न