शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

रंगा आणि बिल्लाचं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच, पण हे दोघे इतके कुख्यात का होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 4:48 PM

अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...

रंगा आणि बिल्ला ही नावं कितीतरी सिनेमांमध्ये तुम्ही ऐकली असतील. साधारण ७०-८० च्या दशकातील बहुतेक व्हिलन किंवा साइड व्हिलनची नावं हीच राहत होती. पण ही नावं इतकी का वापरली जायची? तुम्हीही अनेकदा ही नावं ऐकली असतील. मुळात ही काही काल्पनिक नावं नाहीत. तर ७० च्या दशकातील हे दोघे भारतातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक होते. अनेकदा या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. कारण हे दोघे एकत्र गुन्हे करायचे. पण हे दोघे इतके कुख्यात का होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर चला जाणून घेऊ याचं कारण...

६० च्या दशकात छोट्या-मोठ्या चोरी करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारे रंगा(कुलजीत सिंह आणि बिल्ला(जसबीर सिंह) ७० च्या काळापर्यंत कुख्यात गुन्हेगार झाले होते. १९७८ मध्ये या दोघांनी अपहरण आणि हत्येचा एक असा गुन्हा केला होता की, त्यावेळी देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई सुद्धा टेंशनमध्ये आले होते. हा गुन्हा इतका मोठा होता की, देशभरात एकच चर्चा रंगली होती. देशच नाही तर परदेशातही यांची चर्चा होत होती.

२६ ऑगस्ट १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाने भारतीय नौसेनेचे अधिकारी मदन मोहन चोपडा यांची मुले गीता(१६) आणि संजय(१४) यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. अपहरणाच्या २ दिवसांनंतर २८ ऑगस्टला दोन्ही मुलांचे मृतहेद आढळून आले होते.

पैशांसाठी केलं होतं अपहरण

रंगा आणि बिल्लाने नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या एका मुलीचं आणि एका मुलीचं अपहरण खंडणीसाठी केलं होतं. पण जेव्हा रंगा आणि बिल्ला यांना कळाले की, या मुलांचे वडील नेव्हीमध्ये आहेत, तेव्हा त्यांनी दोघांची हत्या केली.

दिल्लीसहीत देश हादरला होता

नेव्ही अधिकारी मदन मोहन चोपडाच्या मुलांच्या हत्याकांडामुळे दिल्लीसहीत देशाला धक्का बसला होता. त्यावेळी या घटनेची चर्चा परदेशातही पोहोचली होती. त्यानंतर लोकांमध्ये रंगा आणि बिल्लाची दहशत निर्माण झाली होती.

पंतप्रधानांनी दिले होते चौकशीचे आदेश

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना जेव्हा या घटनेबाबत माहीत मिळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला होता. कारण देशातील एका मोठ्या सैन्य अधिकाऱ्याही ती मुलं होती. त्यावेळी देशात लोकांमध्ये संताप बघायला मिळाला होता. रस्त्यांवर आणि संसदेत मोरारजी देसाई सरकारवर टिका झाली होती. तेव्हा मोरारजी देसाई यांनीच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते.

नंतर पोलिसांनी मोठ्या मेहनतीनंतर ८ सप्टेंबर १९७८ मध्ये रंगा आणि बिल्लाला आग्र्याहून अटक केली. दोघेही आग्र्यात कालका मेलच्या त्या डब्यात चढले होते. हा डबा सैनिकांसाठी आरक्षित होता. यातीलच एका सैनिकाने पेपरमधील फोटोवरून दोघांना ओळखलं होतं. नंतर चार वर्ष दोघांची कोर्टात सुनावणी सुरू होती. अखेर १९८२ मध्ये रंगा आणि बिल्लाला फाशी देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स