शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भारतातील या राज्यात हिंदू आजही करू शकतात दोन लग्न, पण आहेत दोन अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:59 IST

जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजाचं शासन होतं तेव्हा त्यावेळी पोर्तुगीज सिव्हल कोड लागू करण्यात आला होता.

भारतात हिंदू धर्मातील लोकांना दोन लग्न करण्याची परवानगी नाही. हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार भारतात दोन लग्न करण्याची परवानगी नाही. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतात असंही एक राज्य आहे जिथे हिंदू धर्मानुसार दोन लग्न करण्याची परवानगी आहे आणि याला कायदेशीर मान्यताही आहे. चला जाणून घेऊ या राज्याबाबत...

आम्ही ज्या राज्याबाबत सांगत आहोत ते राज्य आहे गोवा. जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजाचं शासन होतं तेव्हा त्यावेळी पोर्तुगीज सिव्हल कोड लागू करण्यात आला होता. ही बाब 1867 मधील आहे. त्यावेळी भारतात ब्रिटिशांकडूनही सिव्हील कोड बनवण्यात आला नव्हता. पोर्तुगीज सरकारने गोव्यासाठी कायदा तयार केला होता. त्यावेळी गोव्यात ख्रिश्चन आणि हिंदू धर्माचे लोक जास्त होते.

त्यावेळी हिंदू लोकांमध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा रिवाज होता. पण जेव्हा भारतात समान नागरी कायदा लागू झाला तेव्हा सगळेच याच्या अंतर्गत आले. पण गोव्यातील लोकांना सोडून. या कायद्यानुसार हिंदू धर्मातील लोकांना एकच लग्न करण्याची परवानगी मिळाली. पण या कायद्यात काही अटी लागू करत केवळ गोव्यात जन्माला आलेल्या लोकांना एक एक पत्नी असतानाही दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली गेली. हा कायदा अजूनही तसाच गोव्यात लागू आहे.

जेव्हा गोवा स्वतंत्र झाला तेव्हा नव्या राज्यात तोच सिव्हिल कोड स्वीकारण्यात आला जो पोर्तुगीजांच्या शासन काळात होता. यानुसार हिंदूंना काही अटींनुसार बहुविवाहाची परवानगी मिळते. जसे की, पहिली अट आहे की, 25 वर्ष जर पत्नीकडून एकही अपत्य झालं नाही तर दुसरं लग्न करता येईल. दुसरी अट म्हणजे 30 वयापर्यंतही पत्नी जर अपत्याला जन्म देऊ शकत नसेल तर पती दुसरं लग्न करू शकतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेgoaगोवा