शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Lockdown: लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 08:44 IST

लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही,

ठळक मुद्दे३ दिवस स्टेशनवर राहूनही श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने नाराज सगळी कमाई खर्च करुन खरेदी केली कार कुटुंबासह कारने मूळ गावी पोहचले सुरक्षित

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात मजुरांना आपापल्या घरी पाठवण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहे. मात्र लाखो मजुरांच्या तुलनेत सोडलेल्या काही मोजक्याच श्रमिक ट्रेन सोडल्याने अनेकांना घरी जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातच लॉकडाऊन काळात अनेक अजब-गजब किस्से ऐकायला मिळाले.

काही मजूर कित्येक किमी पायी अंतर कापत होते, तर अनेकांनी घरी जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. सध्या असाच एक किस्सा गाझियाबाद शहरात राहणाऱ्या पेंटर लल्लनसोबत घडला आहे. गोरखपूरला राहणाऱ्या लल्लनला लॉकडाऊनकाळात घरी जायचं होतं. लॉकडाऊनमध्ये पहिल्या दोन टप्प्यात काहीच व्यवस्था नव्हती मात्र तिसऱ्या टप्प्यात सरकारने मजुरांसाठी विशेष ट्रेन सुरु केल्या. त्यानंतर लल्लनच्या मनात घरी जाण्याची ओढ लागली.

लल्लन सहपरिवार गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचं तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन दिवस प्रयत्न करुनही लल्लनला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्याने घरी जाण्याची दृढ निश्चयच केला. तीन दिवस वाट पाहूनही तिकीट न मिळाल्याने चौथ्या दिवशी लल्लन बँकेत गेला आणि १ लाख ९० रुपये काढून आणले. त्यानंतर सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी मार्केटला दिला. त्याठिकाणी दीड लाखात त्याने कार खरेदी केली आणि कुटुंबाला घेऊन गोरखपूरला त्याच्या गावी परतला. यानंतर पुन्हा गाव सोडून जाणार नाही अशी शपथच त्याने घेतली.

याबाबत लल्लनने सांगितले  की, बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका होता. श्रमिक ट्रेनने घरी जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु तोदेखील यशस्वी झाला नाही, त्यामुळे बचत केलेल्या पैशातून एक कार खरेदी केली आणि गावी परत आलो. कुटुंबाला गोरखपूरला पुन्हा आणण्यासाठी संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च केली पण माझं कुटुंब सुरक्षित राहिलं याचा आनंद आहे असं तो म्हणाला. लॉकडाऊन काळात असे बरेच किस्से लोकांसाठी सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे