शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

Lockdown: १८ वर्षापूर्वी ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले ‘तो’ पुन्हा घरी जिवंत परतला; मुलींनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 11:05 IST

जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनलॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळगोरखपूरच्या बेचन कुटुंबातील वडील पुन्हा घरी परतल्याने मुलींना आनंद तर पत्नी नाराज

गोरखपूर – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे कामकाज ठप्प झाले आहेत, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातच अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे बेपत्ता झालेली माणसं पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतत आहेत. गोरखपूरमध्ये अशीच एक अनोखी घटना पाहायला मिळाली, ज्या व्यक्तीवर त्याची पत्नी आणि मुलींनी अंत्यसंस्कार केले तो लॉकडाऊन काळात तब्बल १८ वर्षानंतर घरी परतला आहे.

जंगल सालिकराम हे पादरी बाजारच्या बेचन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबला गेले होते. मेहनत, मजुरीमुळे ते घरी परतले नाहीत, काही दिवसानंतर हरियाणा, दिल्ली येथे मजुरी करत स्वत:चा उदरनिर्वाह करत आणि फुटपाथवर झोपत होते. लॉकडाऊनमुळे कामकाज बंद झालं. उपासमारीची वेळ आल्यानंतर याला कुटुंबाची आठवण झाली. एका ट्रकातून तो ५ मे रोजी पादरीबाजार येथे आला. पत्नी माहेरी गेल्यामुळे तिची भेट झाली नाही, पण २ मुलींनी त्यांचे स्वागत केले.

या व्यक्तीला ४ मुली आहेत, दोन मुलींचे लग्न झाले आहे, सध्या घरात २ मुली राहत आहेत. मुलींनी सांगितल्यानुसार २००२ मध्ये सालिकाराम कमवण्यासाठी घर सोडून गेले ते कधीच परतले नाहीत. आईसह सर्व कुटुंबाला वाटलं त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१२ मध्ये वडिलांचा प्रतिकात्मक पुतळा बांधळा आणि त्यावर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर जी अधिकृतपणे कागदपत्रे होती त्याची पूर्तता केली. पण इतक्या वर्षांनी जिवंत असलेल्या पित्याला पाहून मुलींचा आनंद गगनात मावेना झाला आहे. मात्र या घटनेमुळे वडिलांना पश्चाताप होत आहे. कामकाजामुळे गोरखपूरला कधीच घरी आले नाहीत. आता याठिकाणीच काम करणार आणि मुलींचे लग्न चांगल्या घरात लावणार असल्याचं त्यांनी सांगितले.

पती घरी न परतल्यामुळे पत्नी चिंता देवी यांच्यासमोर मुलींच्या संगोपनाचं मोठं संकट उभं राहिलं. घरोघरी भांडी घासण्याचं काम त्यांनी सुरु केले. मुलींना मोठं करुन दोघींचे लग्न लावलं. सालिकाराम भलेही १८ वर्षानंतर घरी परतला असेल पण इतकी वर्ष त्यांनी कुटुंबाला दुखा:त ठेवलं. त्यामुळे नाराज पत्नी घर सोडून गेली, जेव्हा नवऱ्याची गरज होती, अन्नासाठी वणवण भटकावं लागत होतं, तेव्हा ते कुटुंबासोबत नव्हते, आता काम मिळालं नाही, खाण्याचे वांदे झाले म्हणून १८ वर्षानंतर ते घरी परतले, अशा नवऱ्याची गरज नाही, ज्याला आपलं घर आणि कुटुंब सांभाळता येत नाही असं नाराज पत्नी चिंता देवी यांनी व्यथा मांडली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Nisarga Live Updates: 'निसर्ग' चक्रीवादळाचा वेग वाढला, एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

निसर्ग' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम सज्ज

 हजारोंच्या गर्दीतही कोरोना संक्रमित रुग्ण शोधणार; भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला ‘असा’ अविष्कार!

लॉकडाऊनमध्ये अडकले हिंदू नवरीचं कुटुंब; मुस्लीम कुटुंबाने कन्यादान करत पार पाडलं लग्न

कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट; ‘या’ देशात रक्त पिणाऱ्या किड्यांचा हल्ला! 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या