शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कच-यात महाराष्ट्र आघाडीवर!

By admin | Published: April 06, 2015 3:15 AM

देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदेशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होतो तर मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण प्रत्येकी ५०० टनाहून जास्त आहे. शहराची कचरापट्टी करण्यात मुंबईकरांनी दिल्लीकरांनाही मागे टाकले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील सव्वाशे कोटी नागरिक रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा करतात. त्यात महाराष्ट्रात तयार होणाऱ्या २६,८२० टन दैनिक कचऱ्याचा वाटा १८ टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी फक्त ४,७०० टन कचऱ्याचीच पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते, बाकीचा कचरा प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतो.देशात घनकचरा व्यवस्थापनाची एकूण काय स्थिती आहे याविषयी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये दररोज १९,१८० टन, आंध्र प्रदेश/ तेलंगणमध्ये ११,५०० टन, गुजरातमध्ये ९,२२७ टन, कर्नाटकात ८,७८४ टन तर दिल्लीत ८,३९० टन कचरा तयार होतो.अहवालानुसार जेथे रोज १०० ते ५०० टन कचरा तयार होतो अशी ७० शहरे आहेत तर ५० ते १०० टन दैनिक कचरानिर्मिती करणाऱ्या शहरांची संख्या ६० आहे. दररोज ५०० टन किंवा त्याहून अधिक कचरा तयार होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, सूरत, आग्रा, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि कोलकाता यांचा समावेश होतो.