शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

पाच मुलांच्या आईचं 5 मुलं असलेल्या प्रियकरासोबत लॅव्ह मॅरेज, घर सोडून जात होती तर रडू लागली मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 3:24 PM

जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

Weird Love Story: प्रेम किती आंधळं असतं याचं उदाहरण अलवर जिल्ह्यात बघायला मिळालं. इथे एका महिलेने पती आणि पाच मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. हेच महिलेच्या प्रियकराने केलं. त्याने त्याच्या पाच मुलांना, आई-वडिलांना आणि पत्नीला सोडलं. दोघांनी लग्न केलं. हरयाणाच्या एका महिलेने लग्नाच्या 15 वर्षांनंतर आपल्या पाच मुलांना सोडून अलवरमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियकरासोबत निकाह केला. प्रियकर विवाहित आहे आणि त्यालाही पाच मुलं आहेत. जेव्हा महिला आपल्या पाच मुलांना अलवर बाल संरक्षण आरोगाच्या सदस्याकडे सोडून प्रियकरासोबत जाऊ लागली तेव्हा मुलं तिला बिलगून रडू लागले आणि तिच्या मागे धावू लागले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुरूवारी रात्री नूरजहां आणि मौसम खां जयपूरच्या हायकोर्टच्या माध्यमातून प्रोटेक्शन घेऊन अलवरला आले होते. नूरजहां म्हणाली की, तिने 3 महिन्यांआधी जयपूरमध्ये मौसम खांसोबत तिच्या मर्जीने निकाह केला. आता तिला 4 मुलांना बाल संरक्षण समितीकडे सोपवून जायचं आहे. एक मुलगा हरयाणामध्येच मजुरी करतो. पोलिसांनी नूरजहांला समजावण्याचा प्रयत्न केला. आधी तर ती मुलांना सोबत ठेवण्यासाठी तयार झाली, पण नंतर तिने नकार दिला. पोलीस शुक्रवारी सर्व मुलांना घेऊन अलवर बाल कल्याण समितीमध्ये आले. इथे कायदेशीर कारवाई करून मुलांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर नूरजहां आणि मौसम निघून गेले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरयाणाच्या खोहरी गावात राहणाऱ्या नूरजगांचं लग्न 15 वर्षाआधी अलवरमधील तैयबसोबत झालं होतं. नूरजहां म्हणाली की, तैयब ट्रक ड्रायव्हर आहे. तो घरी आणि जातो. ना तो तिची काळजी घेत ना मुलांची. रोज दारू पितो. अशी अनेक वर्ष तिने सहन केली. नंतर ती मुलांना घेऊन माहेरी गेली. 

नूरजहांचा प्रियकर मौसम अलवर जवळच्या तूलेडा गावात राहणारा आहे. त्यांची नातेवाईकाच्या माध्यमातून भेट झाली. मौसमची पत्नी आणि पाच मुलं तूलेडामध्ये राहतात. तर मौसम मजुरीसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरतो. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनीही मुलांना सोडून निकाह केला.मौसमने सांगितलं की, तो त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही. नूरजहांला तो आपल्या सोबत ठेवेल. जिथे तो मजुरी करेल तिथे ते राहतील. तो म्हणाला की, 3 महिन्याआधी त्याने जयपूरमध्ये नूरजहांसोबत निकाह केला. त्यानंतर दोघेही तिच्या माहेरी राहिले.  

बाल संरक्षण समितीने नूरजहांला मुलांना सोबत ठेवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती यासाठी तयार झाली नाही. नूरजहांने दोन मुलींना बालिका आवासमध्ये पाठवलं. दोन मुलांना अलवरमध्ये बाल आवासमध्ये ठेवलं. समितीने मुलांची कस्टडी घेतली आहे. 11 वर्षीय सुनैना सहाव्या वर्गात शिकते. सुनैना म्हणाली की, तिला माहीत आहे की, आई मौसमसोबत राहणार. आमचं आता काय होईल माहीत नाही. आम्हाला आईसोबत रहायचं आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणाmarriageलग्नJara hatkeजरा हटके