शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारतीय शेतकऱ्यानं तयार केली अनोखी इलेक्ट्रीक कार; एलन मस्क देखील होतील हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:33 IST

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय.

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय. ओडिशामध्ये एका शेतकऱ्यानं चक्क सौरऊर्जेवर चार्ज होणारी इलेक्ट्रीक कार तयार केलीय. (odisha farmer electric vehicle that run 300km in a single charge)

तेलाच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं सध्या इलेक्ट्रीक वाहनांचा जमाना आला आहे. अनेक वाहन निर्मात्या कंपन्या आता इलेक्ट्रीन वाहन उत्पादनाकडे वळत आहेत. पण भारतातील एक सामान्य शेतकरी कोणतंही इंजिनियरिंगचं शिक्षण न घेता इलेक्ट्रीक कार तयार करू शकतो यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. ओडिशामधील शेतकऱ्यानं तसं करुन दाखवलंय. 

ओडिशाच्या मयूरभंज येथील सुशील अग्रवाल नावाच्या शेतकऱ्यानं चारचाकी इलेक्ट्रीक वाहन तयार केलं आहे. विशेष म्हणजे ही कार सौरऊर्जेवर चार्ज होणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल ३०० किमी इतकी चालवता येते. 

लॉकडाऊनमध्ये केली कमालसुशील अग्रवाल यांच्या घरीच एक वर्कशॉप आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सगळं कामकाज ठप्प झालं होतं. अशावेळी फावल्या वेळेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्यावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारची बॅटरी साडेआठ तासांत पूर्णपणे चार्ज होते. स्लो चार्जिंग बॅटरी असल्यामुळे ती कमीतकमी १० वर्ष तरी चालेल, असा दावा सुशील यांनी केलाय. 

"लॉकडाऊन लागलं तेव्ही मी घरीच होतो. लॉकडाऊन हटल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होणार याची कल्पना मला होती. त्यामुळे इलेक्ट्रीक कार बनविण्याचा विचार केला. यात मी स्वत:ला व्यग्र देखील ठेवू शकलो. कार तयार करण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ आणि काही पुस्तकांनी मदत घेतली", असं सुशील अग्रवाल म्हणाले. 

"लॉकडाऊनचा सदुपयोग त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार करण्यासाठी केला याचा मला आनंद आहे. या वाहनामुळे प्रदुषण होणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. हेच वाहनांचं भविष्य आहे", असं मयूरभंज येथील आरटीओचे प्रमुख गोपाल कृष्ण दास यांनी सांगितलं.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारFarmerशेतकरीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन