शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अख्खं गावच रंगलंय गाण्यात; या गावात गाणं म्हणूनच मारतात हाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 11:19 IST

या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते.

शिलाँग- म्हण, थोडसं गाणं असा आग्रह करकरूनही गाणं न म्हणणाऱ्या, लाजणाऱ्या मुली किंवा पुरुष  तुम्ही पाहिले असतील. गाणं हे प्रत्येकाचं काम नाही असं आपण धरुन चाललेलो असतो. पण मेघालयातलं एक गाव मात्र एकदम वेगळं आहे. डोंगरदऱ्यांच्या आणि जंगलाच्या कोंदणात वसलेल्या कोंगथाँग या खेड्याजवळ जाताच गाण्यांचे आवाज येऊ लागतात. हे आवाज काही पक्ष्यांनी केलेल कूजन नसते तर ते गावातील लोकांचेच आवाज असतात. या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते. बालपणी या 'धुनीकरणा'बरोबर नामकरण झालेले असले तरी प्रत्यक्ष नावाचा फारसा उपयोग गावामध्ये तसा फारसा केला जात नाहीच.

या गावामधून तुम्ही नुसता एक फेरफटका मारला तरी असे आवाज झोपड्यांमधून येऊ लागतात. एखादी आई आपल्या मुलाला जेवणासाठी हाक मारत असो वा खेळणारी मुले एकमेकांशी बोलत असोत सर्वजण या सांगितिक भाषेतच संवाद साधताना पाहायला मिळतील. ही सगळी संगीतधून निर्माण करण्याची प्रक्रीया अगदी हृदयापासून सुरु होते असं मत पींडाप्लीन नावाच्या बाई सांगतात. त्यांना तीन मुले असून तिन्ही मुलांशी त्या अशाच संगीतमय भाषेत संवाद साधतात. त्या ३१ वर्षांच्या असून आपल्या मुलांशी असा संवाद साधताना प्रेम व्यक्त केले जाते असे त्यांना वाटते. या गावातील समुदायाचे प्रमुख रॉथेल खोन्गसित या संगितभाषेबद्दल स्वत:चा अनुभव सांगताना म्हणतात, जर माझ्या मुलाने काही चूक केली किंवा त्रास दिला तर मात्र मी रागे भरून त्याला त्याच्या खºया नावाने हाक मारतो. तेव्हा मी प्रेमळ सांगितीक भाषेत बोलत नाही.कोंगथाँग खेडं गेली अनेक शतके उर्वरित जगापासून अलिप्त राहिलं आहे. तेथे जाण्यासाठी भरपूर तासांचे ट्रेकिंग करावे लागते. या गावात २००० साली वीज आली आणि साधा मातीचा रस्ताच मुळी २०१३ साली तयार झाला. दिवसभर गावातील लोक जंगलामध्ये गवत आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी जातात त्यामुळं गावात फक्त मुलंच राहातात. जंगलामध्ये लांबलांब असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुमारे ३० सेंकदांची धून या लोकांना उपयोगी पडते.  आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहातो. जशी पक्ष्यांना , प्राण्यांना स्वत:ची ओळख असते, ते एकमेकांशी विशिष्टप्रकारे संवाद साधतात तसेच आम्हीही साधतो, असे खोन्गसित सांगतात.या प्रथेला जिंगरवाइ लावबेई असे म्हणतात. त्याचा अर्थ आदिमातेचं गाणं असा होतो. खासी जमातीच्या दंतकथांमध्ये आदिमातेचा उल्लेख आहे.

टॅग्स :musicसंगीतJara hatkeजरा हटकेnorth eastईशान्य भारत