शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

जगाची लोकसंख्या '८ अब्ज' चा आकडा पार करणार! भारताची चिंता वाढणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 2:46 PM

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे.

वाढती लोकसंख्या हा जगासमोर गंभीर प्रश्न बनत चालला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जगातील लोकसंख्या ही तब्बल ८ अब्ज चा ही टप्पा पार करणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी बनवलेल्या अहवालात हे नमुद केले आहे की येणाऱ्या दशकात लोकसंख्येमध्ये होणारी वाढ ही सुरुच राहील. तर २०५० पर्यंत आयुर्मान सरासरी ७७.२ वर्षांपर्यंत वाढेल. एवढेच काय तर १५ नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीवर लोकसंख्या ८ अब्ज एवढी असे. ही लोकसंख्या १९५० सालच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. १९५० साली पृथ्वीवरील लोकसंख्या २.५ अब्ज इतकी होती.

२०२१ मध्ये प्रत्येक स्त्री च्या मागे सरासरी प्रजनन दर २.३ इतका होता. १९५० मध्ये ५ तर २०५० पर्यंत हा दर २.१ च्या खाली येईल अशी शक्यता आहे. सरासरी आयर्मान वाढणे हे लोकसंख्येचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्यांनी २०५० पर्यंत सरासरी आयुर्मान ७७.२ वर्षे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. वेगवेगळया देशांमधल्या सरासरी वयात भिन्नता आहे. 

चीनची लोकसंख्या कमी तर भारताची चिंता वाढणार?संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अहवालानुसार २०२३ च्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीत भारत पहिल्या क्रमांकावर येईल. तर सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला चीन दुसऱ्या क्रमांकावर जाईल. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे तर २०५० पर्यंत १.३ अब्ज झालेली असेल. आकडे हेही सांगतात की शतकाच्या शेवटपर्यंत चीनची लोकसंख्या ८० कोटी इतकी खाली येण्याची शक्यता आहे.