शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

राँग नंबरमुळे सुरु झाली प्रेमकहाणी पण लग्न झाल्यानंतर महिलेला पोलिसांकडे घ्यावी लागली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 4:45 PM

महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे.

बिहारमधील नालंद जिल्ह्यातून एक विचित्र प्रेमकथा (Weird Love Story) समोर आली आहे. एका महिलेच्या पतीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. यानंतर ती आईसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. तिला ३ मुलेदेखील आहेत. अचानक एके दिवशी तिला एका राँग नंबरवरून फोन आला आणि पुढे दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. या संवादाचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळालं नाही. दोघांनी सोबत राहायचं ठरवलं आणि प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन गेला (Love Story Started with a Call on Wrong Number). आता महिलेचा असा आरोप आहे, की एक वर्ष सोबत राहिल्यानंतर आता तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं आहे. महिला आता पोलिसांकडे आपला प्रियकर आपल्याला परत मिळवून देण्याची मागणी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस स्टेशन परिसरातील डॉक्टर कॉलनीतील आहे. महिला डॉक्टर कॉलनीजवळ आपल्या दोन मुलांसह बसून आपल्या प्रियकराला परत बोलावण्यासाठी सर्वसामान्यांनाही विनवणी करत आहे. या घटनेबाबत अस्थावा येथील रहिवासी गुडिया देवीने सांगितलं की, १ वर्षापूर्वी मालती गावातील रहिवासी सुनील यादव तिच्या भांगात कुंकू भरून तिला पानिपतला घेऊन गेला होता.

वर्षभर तिथे राहिल्यानंतर, आता घरूनच काम करून कमाई करू, असं सांगत तो एका आठवड्यापूर्वी तिला परत पाटणा येथे घेऊन आला. महिलेचा असा आरोप आहे, की पाटणा येथे आल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी जात असल्याचं सांगून तो फरार झाला. एक आठवडा ती आपल्या दोन मुलांसोबत पाटणा स्टेशनवर बसून त्याची वाट बघत राहिली. मात्र तो आला नाही.

यानंतर महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाब असल्याने स्थानकप्रमुखांनी महिलेला तिथे जाण्याचा सल्ला दिला. महिलेनं सांगितलं की, तिच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी तिला घरातून हाकलून दिलं होतं, त्यानंतर ती आपल्या आईसोबत मुलांसह अस्थावा येथे भाड्याच्या घरात राहू लागली. दरम्यान, वर्षभरापूर्वी राँग नंबरवरून फोन आला आणि तिचं सुनीलशी बोलणं सुरू झालं.

बोलणं सुरू असतानाच दोघांचा एकमेकांवर प्रेम ज़डलं. महिलेनं सांगितलं की, एके दिवशी सुनीलने तिच्या भांगात कुंकू भरलं आणि तिच्या दोन मुलांसह तिला घेऊन पानिपतला गेला. महिलेला तीन मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्षांची, तर ८ वर्षांचा मुलगा ऋषभ आणि सूर्यांश ५ वर्षांचा आहे. आता महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता ती ना तिच्या माहेरच्या घरी जाऊ शकते ना सासरच्या घरी.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके