शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगरातील कल्याण ते बदलापूर महामार्ग रस्त्यासाठी २२ कोटी

By सदानंद नाईक | Updated: July 18, 2023 15:52 IST

उल्हासनगर पश्चिम मधून कल्याण ते।बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे.

उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी २२ कोटीच्या निधीला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. रस्त्याचे रुंदीकरण ९५ टक्के झाले असून काही दुकानदार न्यायालयात गेल्याने, रस्त्याचे काम रखडल्याचे आरोप होत आहे. 

उल्हासनगर पश्चिम मधून कल्याण ते।बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. त्यातील फॉरवर्ड चौक ते साईबाबा मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार दरम्यान रस्त्याचे काम करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी विशेष निधीची मागणी शासनाकडे लावून धरली होती. अखेर शासनाने पुरवणी मागणित २२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. रस्त्याच्या अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी आमदार आयलानी हे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्या सोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आयलानी म्हणाले. रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदीचे आभार व्यक्त केले.

शहरातील मुख्य ७ रस्त्यासाठी एमएमआरडीएने तब्बल १५६ कोटीचा निधी महापालिकेला दिला असून मूलभूत सुखसुविधेच्या कामासाठी ४६ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. मात्र ४६ कोटीच्या निधीतून लहान रस्ते व गटारीच्या कामाला सुरवात झाल्याचे, महापालिका बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. मात्र या निधीतील कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून महापालिका बांधकामे विभागाने ४६ कोटीच्या निधीतील कामे प्रसिद्ध करावे. या मागणीने उचल खालली आहे. कामा विनाच या निधीतून बिले देत असल्याची ओरड होत आहे. या कामाची चौकशी झाल्यास मोठे मासे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण