शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

सर्व पक्षीय युवा मोर्चा आंदोलकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: July 8, 2024 16:08 IST

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या ...

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या २२ जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह संतोष केणे, हुनमान पाटील, महेश संते, कर्सन पाटील, मधूकर माळी, संदीप पालकरी, शिवाजी माळी, मधूकर पाटील, सुनिल पाटील, रामचंद्र पाटील, अजित म्हात्रे, शिरीषकुमार म्हात्रे, उत्कर्ष म्हात्रे, महादू म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, विनय म्हात्रे, कुणाल पाटील, दीपक म्हत्रे आणि रतन पाटील या २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांना मंजूर केलेला मोबदला त्वरीत देण्यात यावा. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामामुळे नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात यावा. या विविध मागण्याकरीता पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.

आंदोलकांनी पोलिस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना धरणेआंदोलन सुुरु करण्यात आले. आंदोलकांनी उपोषणाचा मंडप उभारण्याकरीता रस्ता खोदून खड्डे केले. मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानी दिली नाही. हे खरे असले तरी ज्या जागेत उपोषणाचा मंडप उभारला ती जागा महापालिकेची नसून एमआयडीसीची आहे. धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. २७ गावांच्या मागण्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर स्थगित केलेल आंदोलन सर्व परवानग्या घेऊन पुन्हा केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे .

टॅग्स :kalyanकल्याण