शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"वय हा मुद्दा नाही, बलात्कार हा बलात्कारच"; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:19 IST

बदलापूर प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी शक्ती कायद्यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे मागणी केली आहे.

Badlapur School Case: बदलापूरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेबार निदर्शने केली. त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करत नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकार रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. आंदोलकांना पांगवताना झालेल्या लाठीचार्जनंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने तिथलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरुन थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

बदलापूरच्या आदर्श विद्यालयात एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर तिथेच काम करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केला. आठवड्याभरानंतर ही घटना उघडकीस आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त नागरिकांकडून रेल रोको देखील करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे.

"दररोज आम्ही महिलांसाठी सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू करण्याचा विचार करतो. खरं तर असं आम्ही यापूर्वी केले होते. मात्र मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने असे क्लास सुरु करणे काळाची गरज आहे. तरीही प्रश्न उरतोच की असं का? सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी? समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री का देऊ शकत नाही. आपल्याला देशभरातून रोज विनयभंग, बलात्काराच्या घटनांबद्दल ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आपला संताप होतो. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, निष्पक्ष न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हणता येईल असा बलात्कारासारखा अपराध सहन करता येणार नाही," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

"आज बदलापूर प्रकरणाबद्दल ऐकून मन हेलावून गेलं. पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की वयोगट हा काही फरकाचा मुद्दा असू शकत नाही. बलात्कार हा बलात्कार असतो. आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. महाराष्ट्राबाबत मी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना विनंती करतो की, प्रदीर्घ प्रलंबित अशा महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती द्यावी. यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसंदर्भातील कायद्याचे सक्षमीकरण होईल. मी हे आधीही बोललो होतो आणि पुन्हा सांगतो, बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या!," असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

शक्ती कायदा आणण्यासाठी किती घटनांची वाट बघणार - रोहित पवार

"बदलापूर येथे घडलेली अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दुर्दैवी घटना घडल्यावर दोन दिवस समाज पेटून उठतो, परंतु दुर्दैवाने ही आग दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. दोषींना फाशी द्या ही नागरिकांची तर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा देऊ ही सरकारची नेहमीची प्रतिक्रिया झाली आहे. वारंवार अशा घटना घडत असताना आपण व्यवस्था म्हणून काय करतोय याचा विचार करणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणींच्या, लाडक्या लेकींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा अस्तित्वात आणण्यासाठी अजून अशा किती घटनांची वाट बघणार?," असा सवाल रोहित पवार यांनी केला.

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीAaditya Thackerayआदित्य ठाकरे