शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 10:48 IST

Akshay Shinde Encounter Badlapur: अत्याचाराची घटना उघड झाली त्या दिवशी हजारोंच्या जमावाने निषेध नोंदवत बदलापूर रेल्वेस्थानकावर आठ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. या आंदोलनात विरोधकांचे लोक असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता सत्ताधाऱ्यांकडून आनंद साजरा.

बदलापूर शाळेतील लहान विद्यार्थीनींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी रात्री एन्काउंटर करण्यात आला. यावेळी अनेकांनी या घटनेचे राजकारण करू नये असा सल्ला दिलेला आहे. असे असताना विरोधकांनी या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाळेचे संचालक मंडळ बीजेपी, आरएसएसचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला असे आरोप होत आहेत. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर शिंदे गटाने बदलापूर स्थानकावर पेढे भरवत आनंद साजरा केला आहे. 

अत्याचाराची घटना उघड झाली त्या दिवशी हजारोंच्या जमावाने निषेध नोंदवत बदलापूर रेल्वेस्थानकावर आठ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. या आंदोलनात विरोधकांचे लोक असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. हे लोक बाहेरचे होते, असेही आरोप केले जात होते. परंतू, पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांत हे लोक बदलापूरचेच होते हे स्पष्ट झाले होते. या आंदोलनात सर्वपक्षीय जरी असले तरी ते सामान्य नागरिक म्हणून सहभागी झाले होते. आता अक्षय शिंदे प्रकरण सत्ताधाऱ्यांना शेकण्याची चिन्हे असताना त्याचा एन्काउंटर झाल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेने त्याच बदलापूर रेल्वे स्थाानकावर जात आनंदोत्सव साजरा केला आहे. 

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आनंद साजरा करण्यात आला. पेढे वाटून फटाके वाजविण्यात आले. ''एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाय'' अशा घोषणा देण्यात आल्या.  शिंदे सरकारचे अभिनंदन अशा आशियाचे बॅनर हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. 

रेल्वे स्थानकाबाहेरही महिला आनंदी...बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटत, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. हा जल्लोष बदलापूरमधील दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर करण्यात आला."आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजकारण कितीही झाले, तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला. आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे.", असे या महिलांनी सांगितले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारी