शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

आरटीओच्या कारभाराविरोधात डोंबिवलीत भाजप प्रणित रिक्षा संघटना करणार ८ जुलैला रस्ता रोको 

By अनिकेत घमंडी | Updated: July 1, 2024 16:40 IST

भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले.

डोंबिवली: कल्याण आरटीओच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य रिक्षा चालक, वाहनचालकांना बसला असून आरटीओ कार्यालयात कोणतेही काम वेळेवर होत नाही, त्या दिरंगाई विरोधात भाजप प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेसह संलग्न संघटनांनी ८ जुलै, सोमवारी कल्याण शीळ रस्ता रोको करून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले. कल्याण आरटीओच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात एक दिवसीय लक्षणीक उपोषण व रास्ता रोको करणार असल्याचे ते म्हणाले. कल्याण आरटीओचे अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे बऱ्याच वेळा चर्चा केली, रिक्षा चालकांच्या अडचणी समस्या त्यांच्यासमोर वारंवार मांडल्या तरीही रिक्षा चालकांची कामे होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नियमात शासनाची फी भरून सर्व कागदपत्रे सादर केली असता, अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येते.

आधी तीन महिन्यापूर्वी एक अधिकारी असताना रिक्षा चालकांची कामे होत होती,आता एक आरटीओ दोन एआरटीओ असे तीन अधिकारी असतानाही सामान्य वाहनचालक, रिक्षा चालकांची कामे करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे मालेकर म्हणाले. अधिकाऱ्यांना हवे असणारे मलाईदार खाते, त्याची वाटाघाटी विषयांमध्ये सर्वसामान्य नागरिक व रिक्षाचालक भरडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व बाबी वारंवार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील ते जाणून-बुजून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये ८ जुलैरोजी इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व येथे एक दिवशीय लक्षणीय उपोषण व कल्याण शीळ रस्ता भागाजी वझे चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

आरटीओ भ्रष्टाचार विरोधात सहा महिन्यात दुसरे आंदोलन : या अगोदरही ३० जानेवारी शहरातील सर्वपक्षीय रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन कल्याण आरटीओच्या विरोधामध्ये, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करण्यात आले।होते. आरटीओ कार्यालयात नागरिक व रिक्षा चालकांच्या पिळवणुकीबाबत एक दिवशीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांची व रिक्षा चालकांची कशी लूट कल्याण आरटीओकडून करण्यात येते याचा दर फलक ही लावण्यात आला होता, त्यावेळी अधिकारी बदलणार असून निश्चित फरक पडेल असे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार आरटीओ अधिकारी बदलले परंतु भ्रष्टाचार मात्र कमी।झालेला नाही असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त।केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली