शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

डोंबिवलीतील नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी; दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास, MIDC अधिकाऱ्यांनी घेतली धाव

By मुरलीधर भवार | Published: October 19, 2022 2:18 PM

सापडले रिकामे ड्रम : पोलिस ठाण्यात तक्रार

डोंबिवली-येथील खंबाळपाडा परिसरात बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारतीच्या आवारातील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले. त्यामुळे काल रात्री नागरीकांना प्रदूषणाचा त्रस झाला. नागरीकांनी याची माहिती कळविताच घटनास्थळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिका:यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी केमिकल्सचे रिकामे ड्रम जप्त करण्यात आले असून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

प्रदूषणाची समस्या डोंबिवलीतील नागरीकांनी गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे. काल रात्री खंबाळपाडा परिसरात केमिकल युक्त दु्र्गंधीचा त्रास येऊ लागल्याने जागरिक नागरीक काळू कोमास्कर यांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या अधिका:यासह एमआयडीसी आणि कामा या कारखानदारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. 

रासायनिक सांडपाणी कोणत्या कंपनीतून सोडण्यात आले. त्यामुळे नागरीकांना प्रदूषणाचा त्रस झाला याचा शोध आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये घेण्यात आला. त्यावेळी कंपन्यामधून सांडपाणी सोडले गेले नसल्याने एका ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या आवारातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीने टेम्पो नेऊन त्या टेम्पोतील केमिकल्सचे ड्रम नाल्यास सोडले होते. त्यामुळे नागरीकांना त्याचा त्रस झाला. 

सापडलेले केमिकल्सचे १५ ड्रम जप्त करण्यात आले असून केमिकल नाल्यास सोडणा:या अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.

केमिकल्सच्या ड्रमना एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेत वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रासायनिक सांडपाणी आत्ता एमआयडीसी परिसरात न सोडता ते अशा कुठल्याशा अडोशाला असलेल्या जागी सोडले जाते. या जागांवर आत्ता पोलिस यंत्रणोसह प्रदूषण नियंत्रणाच्या मंडळांनी गस्तीच्या माध्यमातून लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी केली आहे.

फेब्रूवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रदूषण समस्येची गंभीर दखल घेत. प्रदूषण रोखण्यासाठी कंपन्याना कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नुतकेच विद्यमान सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रदूषण रोखण्यासाठी लवकर बैठक घेतली जाईल असे आश्वासान महिन्याभरापूर्वीच दिले होते. मात्र अद्याप काही बैठक झालेली नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली