शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Published: November 07, 2022 11:25 AM

पक्षाच्या युवा मोर्चा कल्याण जिल्ह्यातून दहा हजार पत्र पाठवणार

डोंबिवली: नागरिकांना केंद्र सरकारच्या लाभदायी योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या नागरिकांनी मिळालेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी या मजकुराचे पोस्टकार्ड लिहून मोदींचे आभार मानणारे पत्र नागरिकांच्या माध्यमातून पाठवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कल्याण जिल्ह्यातून १० हजार पत्र पाठवण्यात येणार असून रविवारी त्या उपक्रमांतर्गत ५ हजार पत्र पाठवण्यात आली आहेत.

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सोमवारी ही माहिती देतांना सांगितले।की, भाजप कल्याण जिल्ह्यात डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ ह्या शहरांमध्ये युवा मोर्चा च्या माध्यमातून धन्यवाद मोदीजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोच्या वतीने रविवारी मेगा ड्राइव्ह घेण्यात आला. त्यात पाच हजारहुन अधिक पत्रे ह्या वेळेस नागरीकांनी उत्स्फूर्तपणे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवर्षांपासून देशभरातील नागरिकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

सदर योजनेत गोर गरिबांना घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, महिलांना चूल मुक्ती व्हावी यासाठी उज्वला गॅस योजना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान पीकविमा योजना, ग्राम सिंचाई योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना कुठल्याही प्रकारचे व्याज न घेता दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण, बेटी बचाव-बेटी पढाव, सुकन्या योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजना, सुरक्षा विमा योजना यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात व नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतांना दिसून येत आहे.

देशातील विविध समाजाच्या शेवटच्या घटकांला न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाने केले आहे. धन्यवाद मोदीजी हे अभियान राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत पाच लाख लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या हस्ताक्षरातील पाच लाख पत्रे पाठवले जाणार आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष अभिजित करंजुले, अभियान संयोजक पवन पाटील, युवामोर्चा जिल्हा प्रभारी रवी तिवारी, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, कृष्णा पाटील, संदीप पाटील, दुर्वेश राणा, जिल्हा पदाधिकारी स्वानंद भणगे, समीर दलाल, शैलेश देशपांडे व मंडल पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी