शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उल्हासनगरातील डम्पिंग हटवासाठी काँग्रेसचे उपोषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 19:18 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे.

उल्हासनगर : खडी खदान डम्पिंग ग्राऊंडमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाने नेताजी चौकात बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले. महापालिकेकडून ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला उन्हाळा व हिवाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात डम्पिंगची दुर्गंधी पसरते. याप्रकाराने डम्पिंग परिसरातील शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना खाज, त्वचा रोग, दमा, टीबी आदी रोगाची लागण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. डम्पिंग हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे लावून धरली असून त्यासाठी रस्ता रोखो, उपोषण, धरणे आंदोलन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली. आतातर डम्पिंगची काय स्थिती आहे, ते कुठे व केंव्हा हटविणार याबाबत महापालिका प्रशासन काहीएक बोलत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

 शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत काहीएक निर्णय महापालिका घेत नसल्याने, अखेर रोहित साळवे यांनी नेताजी चौकात सहकाऱ्यांसह बुधवारी आमरण उपोषणाचा सुरू केले. डम्पिंग हटविण्याची प्रक्रिया सुरू करणे, ज्याठिकाणी डम्पिंग हटविले जाणार. तेथिल परिस्थिती काय? पावसाळ्यात डम्पिंग मधून प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर काही उपाययोजना केली का? असा प्रश्न साळवे यांनी यावेळी केला. तसेच प्रसिद्ध शिवमंदिर, सिंधी समाजाचे चालिया मंदिर डम्पिंग ग्राऊंड पासून अवघे १ की.मी. परिसरात येत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर