शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू

By मुरलीधर भवार | Published: June 13, 2023 6:09 PM

२००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील वृक्षांची गणना महापालिकेने आजपासून सुरु केली आहे. हे काम वर्षभर सुरु राहणार आहेत. यापूर्वी २००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे.

खाजगी एजन्सी मार्फत वृक्ष गणना करण्यात आहे. पूर्ण टेक्नॉलॉजी वापरत मोबाईल ॲप ,सॉफ्टवेअर, डॅशबोर्ड सुद्धा असणार आहे. शहरातील खाजगी , सरकारी जागेतील , महाविद्यालय,शाळा किंवा कुठल्याही जागेतील झाडे मोजले जाणार आहेत. त्याचा सर्व रेकॉर्ड मेंटेन केला जाणार असून झाडाची स्थिती झाडाचे वय देखील काढले जाणार आहे. तर शहराच्या कानाकोपर्यातील वृक्षाची माहितीसह गणना करणे आवश्यक असल्यामुळे वृक्ष गणना पुढील वर्षभराचा कालावधीत पूर्ण होईल असा दावा उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी केला आहे.

महापालिका हद्दीत कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या कामात दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ३ हजार झाडे बाधीत झाली होती. या बाधित झाडांच्या बदल्यात एमएमआरडीने दिलेल्या निधीतून महापालिकेने आंबिवलीनजीकच्या टेकडीवर वनराई फुलविली. या टेकडीवर विविध प्रकारचे १५ हार ५०० झाडे लावण्यात आली. त्याच टेकडीलगत आणखीन काही भूखंडाची मागणी करुन त्याठिकाणी या वनराईचे एक्स्टेशन करण्याचा प्रकल्प महापालिकेच्या डोक्यात आहे. प्रकल्पात अनेक झाडे तोडण्यात आलेली आहेत. तसेच विविध बिल्डरांकडूनही झाडे तोडली जाता. त्यांच्याकडून एका झाडाच्या बदल्यात झाडे लावून घेतली जातात.

महापालिकेच्या डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात माजी आमदार अशोक मोडक आणि सामाजिक कार्यकर्ते अप्पा बाहेकर यांनी ५ हजार झाले २५ वर्षापूर्वी लावली होती. तर कल्याण शीळ रोड लगत नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीतील सेवेकऱ््यांनी झाडे लावली आहेत. डोंबिवली ठाकूर्ली नजीक असलेल्या रेल्वेच्या जागेतील जवळपास एक हजार झाडे तोडण्यात आली होती. आत्ता उंबार्ली टेकडीवर वनराई आहे. महापालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या कारकिर्दीत २००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती.

टॅग्स :kalyanकल्याण