शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

By प्रशांत माने | Published: November 01, 2022 9:24 PM

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.'

कल्याण:  सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे. काही लोक एकत्र आल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही. त्यामुळे मी अनेकवेळा ऐक्याची भुमिका मांडलेली आहे. परंतू रिपाई एकत्र होत नाही. अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमधील कार्यक्रमात व्यक्त केली.

दलित पँथर चळवळीला मंगळवारी ५० वर्षे पुर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ विठ्ठल शिंदे लिखित ‘दलित पँथर क्रांतिकारी नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आठवले बोलत होते. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक शिंदे आणि  साहीत्यिक प्रा. डॉ प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले दलित पँथर चवताळून उभा राहीला, तो अन्याय करणा-यांविरोधात. आमच्या पोटात आग पेटली होती न्यायासाठी स्वत: उध्वस्त होणे अशी भुमिका आम्ही घेतली होती. विनाकरण कोणाला उध्वस्त करणारे नव्हतो. पँथरच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा केली नाही. दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर रिपाईचे ऐक्य कायम राहीले असते.

राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात मतभेद झाले नसते  तसेच मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद उभा राहीला नसता तर आज चित्र वेगळे असते. परंतू मार्क्‍सवादापेक्षा आंबेडकरवाद व्यापक  आहे असे माझे मत आहे. मार्क्‍सवादाच्या पलीकडे जाणारा असा आंबेडकर वाद आहे. सर्वाना एकत्र घेतले पाहिजे अशी भुमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घेतली होती याकडे आठवलेंनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण