शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

 डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम; मनसेने दिले पुन्हा आयुक्तांना निवेदन

By मुरलीधर भवार | Published: June 21, 2023 7:14 PM

कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केवळ चार दिवस दाखविण्याकरीता कारवाई केली जाते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केवळ चार दिवस दाखविण्याकरीता कारवाई केली जाते. मात्र चार दिवसांनी पुन्हा फेरीवाले स्टेशन परिसरात बस्तान मांडून बसतात. या प्रकरणी मनसेने आज पुन्हा महापालिका आयुक्त डा’. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आज आयुक्त दांगडे यांची भेट घेतली. यावेळी मनसे पदाधिकारी योगेश पाटील, अरुण जांभळे, प्रभाकर जाधव आणि रोहित भोईर हे उपस्थित होते. स्टेशन परिसरात १५० मीटरच्या अंतरात फेरीवाले बसू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. महापालिकेचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत याकडे घरत यानी आयुक्तांची लक्ष वेधले. मनसेने फेरीवाल्याच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मनसे आमदार राजू पाटील हे स्वत: आयुक्तांना भेटले होते. आयुक्तांनी त्यांना एप्रिल महिन्यात कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र कारवाई काही झाली नाही. मनसे आमदार प्रत्यक्ष पाहणीकरीता जाणार असल्याचे कळल्यावर महापालिकेने कारवाई करण्यापूर्वीच सगळा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त दिसून आला. मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती उद्धवली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना स्मरम देण्याकरीता मनसेचे घरत यांनी भेट घेऊन आठवण करुन दिली आहे.

त्याचबरोबर २७ गावातील नागरीकांना १० पटीने मालमत्ता कर आकारला जातो. या कराची फेररचना करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यासाठी समिती गठीत करुन निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर पलावा सिटीतील नागरीकांना मेगा सिटी प्रकल्पाा नियमानुसार सवलत द्यावी अशी मागणीही मनसे आमदार पाटील यांनी केली होती. दहा पट मालमत्ता कर आकारणी आणि ६६ टक्के कर सवलत देण्याचा निर्णयही अद्याप घेण्यात आलेला नाही. त्याची समितीही गठीत केलेली नाही. दरम्यान १५ जून पासून थकीत मालमत्ता कर धारकांकरीता आयुक्तानी अभय योजना लागू केली आहे. मालमत्ता कराची फेररचना झाल्यास २७ गावातील नागरीक अभय योजनेचा लाभ घेता येईल याकडे आमदारांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. या आशयाचे आमदारांचे पत्रही घरत यांच्या माध्यमातून आयुक्तांना देण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे