शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

By मुरलीधर भवार | Updated: July 3, 2024 14:56 IST

हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील शंभरफूटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषम शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.

संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यास निघाला होता. वाटेत शंभरफूटी चौकानजीक एका दारुच्या दुकानातून बिअर घेण्यासाठी संदीप आणि चव्हाण थांबले होते. बिअर घेऊन निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चा’परने हल्ला केला. हल्ला करुन ते पसार झाले. संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याणच्या काेळसेवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील उर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपीपैंकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या प्रकरणी पेंद्या याने संदीपच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता. संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संजयला शंभरफूटी चौकात गाठले. त्याच्यावर चा’परने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारले. अटक आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या हत्या प्रकरणातील अन्य एका आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा शाेध घेत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस