शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे बाप्पाचे विसर्जन वेटिंगला, गणेश भक्तांनी व्यक्त केला तीव्र संताप

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 21:27 IST

या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.

कल्याण - कल्याण डाेंबिवली महापलिकेने गणेश विसर्जनासाठी चोक व्यवस्था केली असल्याचा दावा केला होता. मात्र महाालिकेचा हा दावा कल्याण पश्चिमेतील केडीएमटी बस डेपोजवळ असलेल्या गणेश विसर्जन घाटावर फोल ठरला आहे. या ठिकाणी आलेल्या गणेश मूर्त्या विसर्जन करण्याकरीता पाण्यात उतरणारे कामगार नसल्याने बाप्पांना विसर्जनासाठी वेटिंगला राहावे लागले. अखेरी संतप्त गणेश भक्तांनी त्यांच्या गणेशाला निरोप देण्यासाठी दुसरीकडेचे विसर्जन स्थल गाठले. या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले.

महाापलिकेने केडीएमटी बस डेपोजवळील गणेश घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली होती. आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन असल्याने अनेक गणेश भक्त त्यांच्या घरातील बाप्पाची मू्र्ती घेऊन गणेश घाटावर पोहचले. त्याठिकाणी त्यांनी आरत्या सुद्धा घेतल्या. मात्र गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोणाच्या हाती द्यायची यासाठी जबाबदार व्यक्तीच नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.

या ठिकाणी विसर्जनाकरीता आलेल्या विद्या गोळे यांनी सांगितले, याठिकाणी मूर्ती विसर्जनासाठी आले होते. त्याठिकाणी विसर्जनासाठी मुले नव्हती. मूर्ती ठेवण्याकरीता कठडा देखील नव्हता. दर वर्षी आम्ही विसर्जनाकरीता येतो. तेव्हा व्यवस्था असते. यंदा व्यवस्था नसल्याने आम्हाला बाप्पाची मूर्ती घेऊन परत माघारी फिरावे लागले. दुसऱ््या ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करणार आहे.

किरण खाडे हे देखील विसर्जनाकरीता त्यांच्या बाप्पाची मूर्ती घेऊन आले होते. आरती केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाकरीता मुले नाहीत. घारात बाप्पाचे दीड दिवस पूजन केले. त्यांचा अवमान महापालिकेकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, याठिकाणी आमचा पोलिस बंदोबस्त आहे. मात्र मूर्ती विसर्जनाकरीता मुले नसल्याने एखादा विसर्जनाच्या वेळी कोणी बुडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. विजेसह जनरेट लावला आहे. त्याठिकाणी अग्नीशमन दलाचे दोन तरुण होते. मूख्य व्यवस्थाच नव्हती.

याठिकाणी अन्य लोकही विसर्जनाकरीता आले. मात्र त्याठिकाणी व्यवस्थाच नसल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. अखेरीस या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसही निघून गेले.याठिकाणी महापालिकेने गणेश भक्तांचे स्वागत करणारा फलक लावला होता. त्यात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली असल्याचा उल्लेख होता. त्याठिकाणी कृत्रिम तलावच नव्हता. महापालिका कर्मचाऱ््यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले आमच्यावर केवळ स्वच्छतेचेची जबाबदारी दिली गेली आहे.या संदर्भात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना ही बाब कळताच त्यांनी या प्रकरणात तातडीने दखल घेऊन काय झाले आहे ते पाहते असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका