शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया

By मुरलीधर भवार | Published: November 08, 2022 2:32 PM

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कल्याण-राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसताना राजकीय दाैरे सुरु आहे. शेतकऱ्यांना आदी मदत द्यावी. शेतकऱ्यांचे अश्रू पूसण्याची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारची आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून ठोस पावले उचलणे अपेक्षित असताना राजकीय दौऱ्यांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत तर दुसरीकडे शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात महेश तपासे यांनी सांगितले.

शिंदे- फडणवीस सरकार अतिशय उदासीन आहे. अतिवृष्टीमुळे जवळजवळ 25 ते 27 लाख हेक्टर शेती उध्वस्त झालीय त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना वाचाळविर पदवी दिली पाहिजे त्यांना शेतकऱ्यांचे दुःख अश्रू दिसत नाहीत. शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अब्दुल सत्तार काय कामगिरी करतात हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याबाबत बोलताना कार्यकर्त्यांची भावना असते आपल्या लोकांचे स्वागत करायचे मात्र जास्तीत जास्त दायित्व कोणाचं आहे. अश्रू पुसण्याची जबाबदारी ही सरकारचे असते. सरकारमध्ये जे लोक आहेत ते मजोरीने काम करतात. सरकारमध्ये जे लोक बसले त्यांच्या मधला मगरुरपणा हा कमी होत नाही आणि या राज्यातल्या शेतकरी असेल दिन दुबळा असेल आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक असेल त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीचे धोरण शिंदे सरकारकडे नाही अशी टीका केली.

टॅग्स :FarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार