शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"कल्याण- शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा"; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2024 15:17 IST

हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण : कल्याण-शिळ रस्त्यावर कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहेत. हे काम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पावसाळी अधिवेशात केली आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी रस्ते उपलब्ध करुन द्यावेत. हे काम तळोजापासून सुरु करण्यात यावे. कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरी सिमेंंट कॉंक्रिटीकरणापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम भूसंपादन अभावी रखडले आहे. रस्ते बाधितांना ३०० कोटी रुपयांचा मोदबला देणे बाकी आहे. हा मोबदला तातडीने देऊन रस्ते विकासाचे रखडलेले काम मार्गी लावावे. २७ गावांची नगरपालिका करण्याचा विषय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी २७ गावांपैकी महसूली उत्पन्न देणारी ९ गावे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात ठेवली आहेत. याशिवाय १४ गावे वगळून ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली आहे. २७ आणि १४ गावांप्रकरणी सरकारकडून ठाेस भूमिका घेतली जात नाही. २७ गावात एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्याकडून गृह संकुले उभारली जात आहे. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघाचा काही भाग ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि प्राधिकरणाकडून विकास कामांचे नियोजन शून्य आहे. २७ गावात अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामात समन्वयाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासह गटारांची कामे केले आहे. ती पुन्हा खोदून करावा लागत आहेत. डोंबिवली जिमखान्यासमाेरचा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या तीन महिन्यात तो रस्ता खोदावा लागला. तो पुन्हा केला जात आहे. मात्र अशा प्रकारे बेजबादारपणे काम करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रस्त्यांच्या कामांना कोणत्याही प्रकारचा दर्जा राहत नाही. त्यामुळे ठाणे आणि कल्याण डाेंबिवली महापालिका ह्द्दतील रस्त्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे.अमृत पाणी पुरवठा योजना ही पाणी विरतण व्यवस्था समक्ष करण्यासाठी आहे. या योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण झालेले नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलvidhan sabhaविधानसभा