शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
3
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
4
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
5
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
6
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
7
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
8
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
9
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
10
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
11
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
12
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
13
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
14
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
15
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
16
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
17
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
18
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
19
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
20
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...

आमदार, मंत्री रुळावर आले हे बरच झालं : राजू पाटील 

By अनिकेत घमंडी | Published: July 08, 2024 7:48 PM

रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  

डोंबिवली : मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात बरसणाऱ्या तुफान पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, बरच झालं आमदार, मंत्री रेल्वे रुळात अडकले, वाहतूक कोंडीत फसले, निदान आता तरी राज्य शासनाला कळेल की समांतर रस्त्याची मनसेची मागणी किती योग्य आहे, होती. 

तसेच रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  पावसाळी अधिवेशनासाठी निघालेले आमदार आणि मंत्रीच ट्रेनमध्ये अडकले. अखेर रेल्वे रुळांवरुन पायी वाट काढत त्यांना पुढचा प्रवास करावा लागत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवर पायी जावं लागलं. 

यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, आमदार रुळावर आले हे बरं झालं असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मी ही पाठपुरावा करत होतो, मात्र मागणी पूर्ण होताना दिसत नाही. रेल्वेच्या बाजूने एक पर्यायी मार्ग असायला पाहिजे. महाराष्ट्र हे देशातला एक नंबरच राज्य आहॆ, मात्र दरवेळेस वेळेस रेल्वेचा प्रॉब्लेम येत असल्याने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

रेल्वे समांतर रस्ता हवा ही मागणी मनसेची असून दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी ते महापौर, आमदार असताना सर्वप्रथम कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता अस्तित्वात आणला, त्याचा वापर सत्ताधार्यांना करता येत नाही हे दुर्दैव आहे म्हणा, आर्थिक विषयावर सगळे अडकले असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली