शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

कल्याण रेल्वे स्थानकात हरवलेली दागिन्यांची बॅग; अवघ्या अर्ध्यातासात पोलिसांनी लावला शोध

By मुरलीधर भवार | Published: June 24, 2024 5:41 PM

तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती.

मुरलीधर भवार,कल्याण: तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती. कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून पुन्हा त्यांना परत केली आहे.

डोंबिवली आजदेपाडा येथे राहणाऱ्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे आर्मी ऑफिसर मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या त्यांचे पती जम्मू येथे कर्तव्यावर आहेत. डोंबिवलीलतील माहेरी परतण्यासाठी काल सायंकाळी त्या अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता नाशिकहून तपोवन एक्सप्रेस रेल्वेने निघाल्या. त्या कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९;३० च्या सुमारास उतरल्या. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. एका बॅगेमध्ये दागिने होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवली जाण्यासाठी गाडी पकडली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांची एक बॅग दिसत नाही. ती कुठे विसरलो. हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला फोनवरुन सांगितला. त्यांनी धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. धनश्री यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना फलट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती फौजदार रोशनी तिरोले यांना फोनद्वारे कळून त्याचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवले. याच दरम्यान धनश्री तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांना त्यांची हरवलेली दागिन्याची बॅग परत करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासातच बॅग परत मिळाल्याने धनश्री यांनी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस