शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आत्ता कुणाल कामराची रिक्षा, अधिवेशनातील महत्वाचे विषय भरटकविण्यासाठी केलेला खेळ

By मुरलीधर भवार | Updated: March 24, 2025 22:05 IST

अधिवेशन संपले नागरीकांच्या पदरात काय पडले ? मनसे नेते राजू पाटील यांनी केले ट्वीट

कल्याण-कराड-मुंडे, अबू-आैरंगजेब, खोक्या, कबर, नागपूर, दिशा व आत्ता कुणाल कामराची रिक्षा...अशा प्रकारे बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्ण घेऊन बजेट अधिवेशन संपणार लाेकांच्या पदरात काय पडले ? असा सवाल मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपस्थित करीत महायुतीवर टिकेचा निशाणा साधला आहे.कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले. ते गाणे प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे या गाणावरुन राजकारण चांगले तापले. हा विषय आत्ता राजकीय चर्चेचा ठरला आहे. या विषयाला धरुन मनसेचे नेते पाटील यांनी ट्वीट करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीला टिकेचे लक्ष्य केले आहे.

मनसेचे नेते पाटील यांनी सांगितले की, कुणाल कामरा संदर्भात मी जे ट्वीट केले आहे. ती क्लीप जानेवारी महिन्यातील आहे. ते ट्वीट चांगले वाईट हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्ही बघाल की, अधिवेशन सुरु झाल्यापासून तो आबू आझमी आला. कराड-मुंडे आले. आैरंगजेब आला. त्यानंतर दीशा सालियन आली. हे विषय भरकावटण्यासाठी किंवा काही कारण असेल ही क्लीप आली. एकंदरीच खूप दिवसांनी अधिवेशन पूर्ण काळ सुरु हाेते.

अधिवेशनात महत्वाचे प्रश्न सुटतात. परंतू ही दोघांची इच्छा नाही का ? असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. त्याचबराेबर एकतर लाडकी बहिण योजना फ्ला’प गेली आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. या महत्वाच्या गोष्टीत अधिवेशनाच्या चर्चेत उघडकीस येतील म्हणून हा केलेला खेळ आहे. त्याच रागापोटी विचारांती मी एक ट्वीट केले. झाले, संपले अधिवेशन लोकांच्या पदरात काय पडले ? या अनुषंगाने मी ते ट्वीट केले आहे.