शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे 50 टक्केच भूसंपादन; १३ वर्षांपासून केंद्र, राज्य शासन समन्वयाच्या अभावाचा फटका

By अनिकेत घमंडी | Published: July 20, 2024 6:19 AM

या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गाचे १३ वर्षांत अवघे ५० टक्केच भूसंपादन झाले आहे. केंद्र, राज्य शासन त्या मार्गाचा विकास करण्यात हात आखडता घेत आहे, असा आरोप कल्याण-कसारा व कर्जत (के-थ्री) या रेल्वे प्रवासी संघटनेने केला. त्यांनी याबाबत दिल्लीत रेल्वे बोर्डाकडे माहिती मागवली असता कामाच्या कूर्मगतीचे गुपित उघड झाले. या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सातत्याने पाठपुरावा करूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कल्याण-कसारा तिसरा मार्ग कुठे अडकला? स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात असताना नेमके घोडे अडले कुठे, असा सवाल त्यांनी केला. कल्याण-कसारा या ६७.३५ किलोमीटर मार्गावर तिसऱ्या लाइनला २०११ मध्ये मंजुरी मिळाली, त्यासाठी सुमारे १४३५.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. केवळ ५० टक्के भूसंपादन काम झाले असून, अजून काम सुरू असल्याचे घनघाव म्हणाले.

गेल्या १३ वर्षांत कामाची फारशी प्रगती झालेली नसून ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय मिळायला हवा, इथला प्रवासी पिचला जात असून त्याला होणारा त्रास, वेदना त्याचे काहीच मूल्यमापन नाही का, अशा शब्दांत घनघाव यांनी नाराजी व्यक्त केली.

...तरच जलद लोकल

कल्याण-कसारा चौथी लाइनबाबत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन काम बघत असून त्यांचेही काम सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच कल्याण बदलापूर ३/४ था मार्गाचे काम एमआरव्हीसी बघत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप या मार्गांवरील मार्गिकेचा पत्ता नसल्यानेही कामे कधी होणार, याकडे कोणाचेही लक्ष नाही. गर्दीचे विभाजन होणार तरी कसे? गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्ग वाढवायला हवेत तरच जलद लोकल भविष्यात बदलापूर, आसनगाव मार्गावर धावतील अन्यथा कठीण होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वे