शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यपालांच्या हस्ते 'लोकमत कल्याण - डोंबिवली गौरव सन्मान' प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:35 IST

कल्याण डोंबिवलीची ओळख मुंबईचे सॅटेलाईट शहर इतकीच न राहता एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी ओळख व्हावी व त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

कल्याणडोंबिवलीची ओळख मुंबईचे सॅटेलाईट शहर इतकीच न राहता एक स्वतंत्र प्रतिभेचे महानगर अशी ओळख व्हावी व त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण - डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण, समाजकार्य, कला, शिक्षण, साहित्य व उद्योग या क्षेत्रातील ५० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, रिजन्सी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक महेश अगरवाल, लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व  अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कल्याण शहराला मोठा इतिहास लाभला आहे. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी योगदान देणारी विविध रत्ने शोधून त्यांना सन्मानित केल्याबद्दल राज्यपालांनी लोकमत समूहाचे अभिनंदन केले.  

समाजाच्या उभारणीमध्ये विविध प्रकारचे कामगार, कुशल कामगार, हस्तकला कारागीर, आदिवासी कलाकार हे निरपेक्षपणे योगदान देत असतात. हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहून आपापले काम करीत असतात. लोकमत सारख्या सर्वदूर विस्तार असलेल्या वृत्तपत्राने अश्या अनाम कामगारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करावे जेणेकरून त्यांना काम करताना नवा हुरूप येईल असे राज्यपालांनी सांगितले.  लोकमत वृत्तपत्र दररोज २.२५ कोटी लोकांपर्यंत पोहोचते असे सांगून लोकमत महाराष्ट्र व गोव्यातील प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र असल्याचे ऋषी दर्डा यांनी सांगितले.  लोकमत वाहिनी तसेच डिजिटल माध्यम यांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.  

कल्याण डोंबिवलीचा कायापालट होतोय: आयुक्त डॉ विजय सूर्यवंशीकल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची उभारणी केली होती. आज कल्याण डोंबिवलीचा कायापालट होत आहे. या ठिकाणी नौदलाचे स्मारक, रिव्हर फ्रंट विकास होत आहे तसेच उद्यान, कबड्डी स्टेडियम, क्रीडा संकुल, नवे रुग्णालय, कॅन्सर रेडिएशन सेंटर देखील निर्माण होत आहे. हे शहर नागरिकांच्या सहकार्याने आपण देशात नावारूपाला आणू असे प्रतिपादन कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.    यावेळी राज्यपालांच्या हस्ते महेश अगरवाल, डॉ विजय सूर्यवंशी, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, डॉ अशिष दादासाहेब धडस, डॉ अनिल अशोक हेरूर, ॲड . संजय भगुराम मोरे, डॉ सचिन राजाराम अहिरे, सचिन दत्तात्रय पोटे, ॲड सोपान विठठल बुदबाडकर, गोरखनाथ सखाराम म्हात्रे डॉ सुनिल गणपत खर्डीकर, संकेत सुनिल खर्डीकर, मुनिर छबुलाल मुल्ला, मच्छिन्द्र युवराज कांबळे, सचिन अर्जुन कदम, हेमंत कुमार आनंदा नेहाते, दिनेश हिरामण पाटील, विनोद तिवारी, शैलेश तिवारी, प्रकाश गोपीनाथ भोईर, डॉ भुषण बाळकृष्ण  सोनवणे, पुनम नारायण शेटटी, डॉ सुनिता बाबुराव पाटील, डॉ सुशिल दुबे, जितेंन्द्र लक्ष्मण पटेल, विजय बबन गावडे, गजानन मोतिराम  पाटील, दर्शना अनंत सामंत, राजन दत्ताजी मराठे, मकरंद रमेश पाटील, जगन्नाथ सखाराम शिंदे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, अनंत विठठल गोसावी, कुणाल दिनकर पाटील, भास्कर विजय अजगावकर, विजय प्रभाकर भोसले, किर्ती अनिल परब, अमित भास्कर म्हात्रे, डॉ महेश बालक‍िशन गोसावी,  संदीप पांडूरंग पाटील, रवीना अमर माळी, प्रेमजी जेठालाल गाला, नमिता मयुर पाटील, डॉ योगेश विजय जोशी, अनिल स‍िताराम म्हात्रे, संजय बाबुराव मोरे, डॉ रविद्र रघुनाथ जाधव, डॉ राजकुमार एम कोल्हे, मंदार श्रीकांत हलबे, योजना संदीप गाईकर यांना सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली