शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साहेब इथं ही राबवा स्वच्छता मोहीम! मलंगरोडला डम्पिंगची अवकळा, कचऱ्यात प्लास्टिकचा खच

By प्रशांत माने | Updated: October 6, 2023 17:03 IST

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे.

कल्याण: २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत यात सक्रिय सहभाग घेतल्याचे कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळाले. दरम्यान वास्तव पाहता ही मोहीम प्रतिदिन मलंगरोड परिसरात राबविण्याची गरज आहे. याठिकाणी नागरीकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची वृत्ती कायम राहीली असताना हा कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने या रोडला डम्पिंगची अवकळा आली आहे.

केडीएमसीकडून शून्य कचरा मोहीमेंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. या कच-यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असताना भटके श्वान आणि गायींचा संचार वाढला असून, श्वान चावाचा धोकाही वाढला आहे. साचणा-या कच-याच्या ढिगा-यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा पडलेला खच पाहता प्लास्टिकबंदीलाही हरताळ फासला गेल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुर्वेतील मलंगरोड हा कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण बनला आहे का? असा सवाल वास्तव पाहता उपस्थित होतो.

दररोज जमा होणारा कचरा वेळेवर आणि नियमितपणे उचलला जात नसल्याने या भागाला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. कचरा दूरवर पसरला असताना या ठिकाणी पडलेल्या कच-यात सर्वत्र प्लास्टिकच पाहायला मिळत आहे. यावरून प्लास्टिकबंदीचा फज्जा उडाल्याचे इथेही स्पष्ट होत आहे. रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिक जसे या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर कचरा वेळेवर व नियमितपणे उचलण्यात हयगय करणारे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन आणि खाजगी कंत्राटदारही तितकेच कारणीभूत आहेत. कच-यामुळे परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रवही वाढला आहे. रस्त्याच्या कडेला डम्पिंगची अवकळा पाहता आयुक्त साहेब इथे ही स्वच्छता मोहीम राबवाच असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न