शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

By मुरलीधर भवार | Published: April 06, 2023 7:01 PM

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण : येत्या महिन्याभरात कल्याण डाेंबिवलीत फेरीवाला धाेरण महापालिका प्रशासनाने लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा मनसेआमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आज मनसेआमदार पाटील यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. 

त्यांनी फेरीवाला मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष मनाेज घरत, पदाधिकारी प्रकाश भाेईर, सुदेश चुडनाईक, राहूल कामत आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. फेरीवालाही माणूस आहे. त्यांच्यासाठी धाेरण राबविण्याची २०१४ सालापासून सुरु आहे. अद्याप ते लागू का झाले नाही. येत्या महिन्याभरात हे धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा दिला आहे. आयुक्त धाेरण राबविण्याविषयी सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यात डाेंबिवलीत स्टेशन परिसरातीळ फेरीवाले हटविले गेले नाहीत तर आंदाेलनाचा इशारा आमदारांनी दिला हाेता. 

त्यांनी आंदाेलन करण्यापूर्वीच फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब झाले. तेव्हा त्यांनी हे शक्य आहे. मात्र प्रशासन करु शकत नाही. याकडे लक्ष वेधले हाेते. आज पुन्हा आमदारांनी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेतली. आत्ता फेरीवाला धाेरण लागू करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झाले असताना त्यांचे जागा वाटप का केली जात नाही हा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला. फेरीवाल्या प्रमाणेच रिक्षा स्टॅण्डलाही जागा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दा उपस्थित केला.

सध्याचे जे राजकारण चालू आहे, कुणी फडतूस बोलतंय कुणी काडतूस बोलतंय. लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष दिल पाहिजे. मी स्वतः राजकारणी आहे. मात्र या पातळीला राजकारण नाही केले पाहिजे कोणाच्या तरी पाठी लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही काही लोकांकडून अपेक्षा असते त्याला खरे उतरले पाहिजे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

चाैकट-राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतं असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केल्याने त्याला कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला. ही योजना महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे असे आवाहन कनार्टकने सरकारने केले आहे. त्यावर मनसे आमदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसेMLAआमदारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका