शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:31 AM

स्वच्छतेसाठी सर्वाधिक काॅल; कोविडमुळे कॅटरिंग बंद

- अनिकेत घमंडीडोंबिवली : रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईच्या मुख्यालयात दिवसाला २५० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल हे रेल्वे डब्यातील स्वच्छतेसह एसी सुरू नसल्याबाबत किंवा गारवा कमी असल्यासंदर्भात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, तसेच त्यांना प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत, त्यात महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक, प्रवासातील गैरसोय तसेच प्रवासात सामान राहिले असल्यास साधारण फोन येणे अपेक्षित असते. मात्र त्या तुलनेत डब्यांमधील स्वच्छता, प्रसाधनगृहातील अस्वच्छता, पाणी नसणे अशा संदर्भात जास्त कॉल येतात. त्याखालोखाल वातानुकूलित डब्यातील एसी कार्यान्वित नसणे, असले तरी गारव्याची समस्या भेडसावणे, तसेच जनरल अथवा स्लीपरच्या डब्यातील पंखे, लाइट बंद असणे अशा समस्यांबाबतही कॉल येतात.  आरक्षित डब्यात विनाआरक्षित प्रवासी चढले आणि त्यांच्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यासंदर्भातही कॉल येतात. बहुतांश वेळा रेल्वे डब्यात असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना प्रवासी सांगतात तेव्हा समस्या सुटण्याची शक्यता असते; पण जवान दिसले नाही तर प्रवासी थेट हेल्पलाइनवर माहिती देतात.  फेक काॅल करणाऱ्यांना शिक्षेची तरतूदकोविड १९ सुरू झाल्यापासून रेल्वेने गाड्यांमधील पॅन्ट्री (खानपान सेवा) बंद केली असल्याने गेल्या ११ महिन्यांत त्यासंदर्भातील समस्येबाबत अथवा मागणीबाबत हेल्पलाइनवर कॉल येणे बंद झाले आहे. तरीही सेवा सुरू करावी, अशी मागणी करणारे कॉल कधी तरी येतात.काही कॉल हे फेक असतात. एखाद्या प्रवाशाने थट्टा म्हणून चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर लगेच कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या असतात. त्यात शिक्षेची तरतूददेखील आहे.समस्या निराकरणास तत्काळ प्रतिसादमहिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल आले तरी त्याचे निराकरण करण्यासाठी आरपीएफ, रेल्वेच्या अन्य यंत्रणा धावपळ करतात. बहुतांश डब्यांमधून सातत्याने पोलीस गस्त सुरू असते, त्यामुळे सुरक्षेसंदर्भात तुलनेने फार कमी कॉल येतात. कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सेवा देण्याचा प्रयत्न करते. प्रवासात प्रसूती, हृदयविकाराबाबत तातडीने मदत केली जाते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे