शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Navi Mumbai: १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा जीआर अखेर सरकारने काढला

By मुरलीधर भवार | Updated: July 9, 2024 19:59 IST

Kalyan News: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्याचा जीआर काढण्यात आलेला नव्हता. अखेर हा जीआर देखील सरकारने काढला आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्याचा जीआर काढण्यात आलेला नव्हता. अखेर हा जीआर देखील सरकारने काढला आहे.

१४ गावे हा ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीवर होती. या १४ गावात ठाणे महापालिकेकडून काही अंशी विकास कामे केली जात होती. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी १४ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली होती. या गावांनी या मागणीकरीता सहा वेळा ग्रामपंचायतीच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकला होता. ही गावे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करणे योग्य ठरणार अशी मागणी उचलून धरली होती. कोरोना काळात ही मागणी मागे पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आमदार पाटील यांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. अर्थसंकल्पिय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राची तातडीने दखल घेत त्याचा जीआर काढला आहे. सरकारने काढलेला जीआर हा संघर्ष समितीच्या लढ्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली आहे. नवीमुंबई पालिकेच्या ४ अभियंत्यांना मूळविभागाचे कामं संभाळून अतिरिक्त कामकाज १४ गावांचे कामकाज पहावयाचे आहॆ, नवीमुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. १४ गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला ११ तारखेपासून सुरवात करणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाkalyanकल्याण