शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
3
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
4
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
5
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
6
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
7
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
8
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
9
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
10
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?
11
ढोल-ताशांचा नाद, पतीचा डान्स अन् शेजाऱ्यांनी काढली दृष्ट, जान्हवी किल्लेकरचं ग्रँड फिनालेनंतर जंगी स्वागत
12
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
13
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
14
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
15
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
16
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
17
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
18
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
19
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
20
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत

Navi Mumbai: १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा जीआर अखेर सरकारने काढला

By मुरलीधर भवार | Published: July 09, 2024 7:57 PM

Kalyan News: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्याचा जीआर काढण्यात आलेला नव्हता. अखेर हा जीआर देखील सरकारने काढला आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्याचा जीआर काढण्यात आलेला नव्हता. अखेर हा जीआर देखील सरकारने काढला आहे.

१४ गावे हा ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीवर होती. या १४ गावात ठाणे महापालिकेकडून काही अंशी विकास कामे केली जात होती. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी १४ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली होती. या गावांनी या मागणीकरीता सहा वेळा ग्रामपंचायतीच्या निवडणूकांवर बहिष्कार टाकला होता. ही गावे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करणे योग्य ठरणार अशी मागणी उचलून धरली होती. कोरोना काळात ही मागणी मागे पडली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आमदार पाटील यांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. अर्थसंकल्पिय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राची तातडीने दखल घेत त्याचा जीआर काढला आहे. सरकारने काढलेला जीआर हा संघर्ष समितीच्या लढ्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली आहे. नवीमुंबई पालिकेच्या ४ अभियंत्यांना मूळविभागाचे कामं संभाळून अतिरिक्त कामकाज १४ गावांचे कामकाज पहावयाचे आहॆ, नवीमुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. १४ गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला ११ तारखेपासून सुरवात करणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाkalyanकल्याण