शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत

By प्रशांत माने | Updated: December 3, 2022 19:17 IST

"आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाही"

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी बनवलेली शिक्षण व्यवस्था आजही आपण वापरत असलो तरी ती व्यवस्था आता काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम लेखक चेतन भगत यांनी कल्याणमध्ये केले. इथल्या केंब्रिया इंटरनॅशनल महाविद्यालयाच्या वतीने के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या करिअर गाईडन्स कार्यक्रमात ते बोलत होते.

"आमच्या वयामध्ये जेवढे पर्याय उपलब्ध नव्हते त्यापेक्षा कित्येक पटीने नवनविन क्षेत्रांची दालने आज खुली झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर करिअरची व्याख्याच पूर्णपणे बदलून गेली असून जग कुठे चालले आहे आणि मी कुठे आहे या गोष्टींचा विचार करूनच करिअर निवडणे महत्वाचे आहे. आताच्या काळात मुलांनी आणि पालकांनी करिअरसाठी पारंपरिक पद्धतीने विचार करण्यापेक्षा जगामध्ये काय सुरू आहे याचाही गांभिर्याने विचार केला पाहिजे याकडेही भगत यांनी लक्ष वेधले. भगत पुढे म्हणाले आपल्या आयुष्यात अनिश्चितता, असुरिक्षतता आणि रिस्क असणे आवश्यक आहे. हेच खरं आयुष्य असून सुरक्षित आयुष्याचा कंफर्ट झोन सोडून आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बाळगा. कोणाच्याही आयुष्यात निश्चित आणि सुरिक्षत असे काहीच नाहीये आणि हीच तर आयुष्याची खरी गंमत आहे," असे भगत म्हणाले.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाहीये. आता आपल्याला जी गोष्ट दु:ख देतेय नंतर त्याच गोष्टीतून आपल्याला सुख आणि आनंद मिळणार आहे या दृष्टीकोनातूनच यशस्वी लोकं काम करत असतात. आपणही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असल्याचे सांगत भगत यांनी उमेदीच्या काळात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाचा जीवनपट त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. यावेळी पोटे ग्रुपच्या संचालक मीनल पोटे, केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या प्रिन्सिपल हिना फाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी भगत यांना सध्याची शिक्षण पद्धती, जागतिक बदल, विद्यार्थी आणि पालकांचा दृष्टीकोन आदींबाबत प्रश्न विचारले. ज्याची भगत यांनी अत्यंत समर्पक अशी उत्तरे दिली.

टॅग्स :Chetan Bhagatचेतन भगतkalyanकल्याण