शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अंध विद्यार्थ्यांसह पालकांनी गाणी गाऊन केल्या भावना व्यक्त; ५० अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचें वाटप

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 12:38 IST

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त ...

डोंबिवली: आमचे विद्यार्थी अंध असले तरी त्यांच्यात भरपूर कलागुण आहेत, त्यांना सामाजिक भावना, बांधीलकी भरपूर असते, त्यांनाही खूप व्यक्त व्हायचं असतं. अनेक सामाजिक संस्था अलिकडच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.  सहकार्य करतात त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आम्ही अशा संस्था, लोकप्रतिनिधी यांचे आभारी आहोत, आमच्या।मुलांना देखील पुढे भविष्यात प्रगती करायची आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने आपण कार्यरत राहू, संपर्कात राहू अशा भावना अंध विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त गाणी गाऊन व्यक्त केल्या.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी या संस्थेच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांच्यासह प्रकल्प अध्यक्ष अजय जैन आदींनी जयहिंद अंध कल्याणकारी संस्था, अंबरनाथ या संस्थेच्या ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. मानपाडा रस्त्यावरील शुभम बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ५० शाळकरी मुलांना बॅग, छत्री, वह्या यासह शालेपयोगी वस्तूंचे वाटप केले. त्यापैकी बहुतांशी पालक हे अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे अलंकार म्हणाले, तुलनेने त्यांना रोजगाराची संधीही कमीच मिळते. तरी ते आपल्या मुलांना शाळेत शिकवून मोठे करण्यासाठी धपडत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरिता अशा मदतीद्वारे काहीसा हातभार लागतो, असेही अलंकार म्हणाले.

अजय जैन यांनी संस्थेद्वारे असा हा कार्यक्रम राबवण्याचे यंदाचे दहावे वर्ष आहे. माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत वह्या उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला मुलांनी व पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांनी,.पालकांना गाणी गायली, कविता म्हंटल्या, व्याख्यान दिले. वातावरण पाहून काही अंध पालकांनी ही गाणी म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुलांनी त्यांच्या समाजाकडून काय अपेक्षा आहेत हे समजावून सांगितले, तर पालकांनी त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे याबद्दलची स्वप्न सांगून त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप शिकावे लागणार आहे, चांगला व्यक्ती बनायचं आहे असे मत व्यक्त केले. संस्थापकिय अध्यक्ष प्रकाश भराडे , महासचिव सुरेश पवार व कोषाध्यक्ष निशा रघुवंशी हे जयहिंद संस्थेतर्फे या कार्यक्रमासाठी उपस्थि होते.